BMC Election 2022, Ward 71 : महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय मागे घेतल्याचा परिणाम पालिकेच्या निवडणुकीवरती होईल का ?

| Updated on: Aug 07, 2022 | 9:08 AM

मागच्या निवडणुकीत सगळे पक्ष वेगळे वेगळे लढले होते. तरी सुध्दा या वॉर्डमध्ये भाजपच्या अनिष नवल मकवानी यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार जितेंद्र जानावळे आणि काँग्रेसच्या जयंतीलाल सिरोया यांचा पराभव केला होता.

BMC Election 2022, Ward 71 : महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय मागे घेतल्याचा परिणाम पालिकेच्या निवडणुकीवरती होईल का ?
BMC Ward 71
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई – मुंबई महापालिकेच्या वॉर्डात (BMC WARD 71) आत्तापासून तयारी पालिकेच्या निवडणुकीची (ELECTION) तयारी सुरु झाली आहे. कारण महाराष्ट्रातलं (MAHARASHTRA) सत्ता कारण आता बदललं आहे. त्यामुळे मुंबईतल्या पालिकेवरती कोण बाजी मारणार हे निवडणुक झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. शिवसेनेचे अनेक आमदारांनी आपली वेगळी भूमिका जाहीर केल्यामुळे शिवसेनेत फुट पडली. त्याचा वाद आता खरी शिवसेना कोणाची यावरून कोर्टात सुरु आहे. हे प्रकरण कोर्टात असल्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोंडीना प्रचंड वेग आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कायम दिल्लीचा दौरा करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मंत्रीमंडळाचा विस्तार केव्हा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 71 जुहू तारा , कुपर रुग्णालय या परिसराचा समावेश होतो. सध्याच्या सरकारने मागच्या सरकारच्या काळात घेतलेले सगळे निर्णय रद्द करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत

जुहू तारा , कुपर रुग्णालय, अशोक नगर या प्रमुख ठिकाणाचा समावेश वॉर्ड क्रमांक 71 मध्ये होतो

तिथं मागच्या पाच वर्षापासून भाजपाची सत्ता होती. 2017 ते 2022 मध्ये अनिष नवल मकवानी हे भाजपचे नगरसेवक होते.

हे सुद्धा वाचा

वॉर्ड रचनेत बदल

महाविकास आघाडी सरकारने मागच्या अडीच वर्षाच्या काळात अनेक निर्णय घेतले. त्यातील अनेक निर्णय सध्याच्या सरकारने सरकार स्थापण झाल्यापासून रद्द केले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते. तर, महाविकास आघाडी सरकारने 236 प्रभाग केले होते. त्यामुळे मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभागात वाढ झाली होती. त्यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी यांचा समावेश होता. परंतु सध्या भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारने हे सगळे निर्णय रद्द केले आहेत.

भाजपच्या अनिष नवल मकवानी यांनी बाजी

मागच्या निवडणुकीत सगळे पक्ष वेगळे वेगळे लढले होते. तरी सुध्दा या वॉर्डमध्ये भाजपच्या अनिष नवल मकवानी यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार जितेंद्र जानावळे आणि काँग्रेसच्या जयंतीलाल सिरोया यांचा पराभव केला होता.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर