बिंदू चौकात या, समोरासमोर चर्चा करु, चंद्रकांत पाटील यांचं चॅलेंज हसन मुश्रीफांनी स्वीकारलं!

| Updated on: Jun 26, 2021 | 4:04 PM

ओबीसींचं राजकीय (OBC reservation) आरक्षण रद्द झाल्यानंतर आज भाजपने राज्यभर चक्काजाम आंदोलन (BJP Chakka Jam Andolan) केलं. भाजपच्या सर्व आघाडीच्या नेत्यांनी आपआपल्या भागात चक्का जाम करुन, ओबीसी आरक्षणाची मागणी केली.

बिंदू चौकात या, समोरासमोर चर्चा करु, चंद्रकांत पाटील यांचं चॅलेंज हसन मुश्रीफांनी स्वीकारलं!
चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ
Follow us on

कोल्हापूर : ओबीसींचं राजकीय (OBC reservation) आरक्षण रद्द झाल्यानंतर आज भाजपने राज्यभर चक्काजाम आंदोलन (BJP Chakka Jam Andolan) केलं. भाजपच्या सर्व आघाडीच्या नेत्यांनी आपआपल्या भागात चक्का जाम करुन, ओबीसी आरक्षणाची मागणी केली. कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात दाभोळकर कॉर्नरला हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. (Come to Kolhapurs Bindu Chowk, let’s discuss face to face on OBC reservation, maharashtra Minsiter Hasan Mushrif accepted BJP Chandrakant Patils challenge!)

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, जर भाजपने ओबीसी समाजाचे आरक्षण घालवले असा आरोप होत असेल, तर कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये (Kolhapur Bindu Chowk) कोणत्याही दिवशी चर्चेला तयार आहे. मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची समोरासमोर चर्चा होऊ दे, किमान त्यानंतर तरी जनतेच्या लक्षात येईल की ओबीसी आरक्षण नेमकं कुणामुळे रद्द झालं”

हसन मुश्रीफ यांचं उत्तर

चंद्रकांत पाटलांच्या या उत्तराला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं. भाजप सरकारच्या पाच वर्षातील नाकर्तेपणामुळे समाजाचं आरक्षण कसं गेलं आणि समाज रस्त्यावर कसा आला याचे पुरावे मंत्री भुजबळ यांच्याकडे आहेत. त्यामुळे चर्चा होऊनच जाऊदेत, आम्ही तयार आहोत, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी दिलेलं आव्हान स्वीकारल्याचं मुश्रीफ म्हणाले.

आमच्या हातात सूत्रं द्या, आरक्षण मिळवून देतो : फडणवीस

ओबीसी आरक्षणासाठी भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सरकारविरोधात आज रस्त्यावर उतरले . नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पाडलं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर तुफान हल्ला चढवला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय, पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

नागपूरमधल्या आंदोलनात फडणवीसांना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. खास करुन त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या 

माझ्या हातात सूत्रं दिल्यास ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन : फडणवीस