AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत बैठकांचा सिलसिला, महाराष्ट्राच्या राजकारणात पड्यामागे मोठं काहीतरी घडण्याचे संकेत

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. अगदी मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत या घडामोडी घडत आहेत. दिल्लीत तर आज मोठ्या हालचाली घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. या घडामोडींमधून आगामी काळात महत्त्वाचं राजकीय समीकरण जन्माला येण्याची चिन्हं आहेत.

दिल्लीत बैठकांचा सिलसिला, महाराष्ट्राच्या राजकारणात पड्यामागे मोठं काहीतरी घडण्याचे संकेत
nana patoleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 29, 2023 | 3:47 PM
Share

नवी दिल्ली | 29 डिसेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अतिशय महत्त्वाच्या हालचाली घडताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जोरदार हालचाली घडत आहेत. मविआत जागावाटपावरुन ठाकरे गट आणि काँग्रेसकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. ठाकरे गटाला 48 पैकी 23 जागांवर निवडणूक लढवायची आहे. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा त्याला विरोध आहे. महाविकास आघाडीत समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरावा, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि ठाकरे गटात शाब्दिक संघर्ष होताना दिसत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीत महत्त्वाच्या आणि मोलाच्या हालचाली घडत आहेत.

महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या हायकमांडने दिल्लीत आज काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण दिल्लीला गेले आहेत. या बैठकीत लोकसभा जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. काँग्रेस नेते या बैठकीत काँग्रेस पक्षाचा अहवाल देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेहलोत समितीवर युती करण्याची जबाबदारी

इंडिया आघाडीसाठी स्थानिक राज्यांतील युती करण्याची जबाबदारी गेहलोत समितीवर नेमण्यात आली आहे. गेहलोत समिती आज आणि उद्या सर्व राज्यांशी चर्चा करणार आहे. या समितीच्या माध्यमातून घटक पक्षांना शिफारशी दिल्या जाणार आहेत. येत्या 2 किंवा 3 जानेवारीला काँग्रेसचे नेते इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर काँग्रेसचा 4 जानेवारीला जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. महाराष्ट्र, झारखंड राज्यात आघाडीची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत जोरदार घडामोडी सुरु आहेत. दिल्लीत आज काँग्रेस कार्यालयात मोठ्या हालचाली घडत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

हेही वाचा | अक्कू यादव हत्याकांड | 200 ते 400 महिलांनी मिळून त्याला कोर्टात का संपवलं?

मल्लिकार्जुन खर्गे महत्त्वाची बैठक घेणार

दरम्यान, काँग्रेसची 4 जानेवारीला पुन्हा एकदा बैठक होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष, प्रभारी, महासचिव यांची बैठक होणार आहे. त्यानंतर ज्या 14 राज्यांमध्ये भारत न्याय यात्रा जाणार त्याबाबतचे नियोजन केले जाणार आहे. या यात्रेचं 4 जानेवारीला यात्रेचा लोगो आणि डिझाईन प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानंतर 8 जानेवारीला यात्रेचा मार्ग सांगितला जाणार आहे. तसेच 12 जानेवारीला यात्रेचे थीम साँग लॉन्च होणार आहे.

प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा निर्णय महाराष्ट्रातच होणार?

एकीकडे काँग्रेसच्या गोटात एवढ्या सगळ्या घडामोडी सुरु असताना महाविकास आघाडीची 31 डिसेंबरला महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्याबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याबाबतचा निर्णय महाराष्ट्रातच होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.