चंद्रकांत खैरे यांचं ‘ते’ विधान झोंबल, काँग्रेस-ठाकरे गटात पहिल्यांदाच जुंपली; नाना पटोले म्हणाले, ज्यांना आपला पक्ष सांभाळता…

फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे त्यांची ही धडपड सुरू आहे, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यावर पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत खैरे यांचं ते विधान झोंबल, काँग्रेस-ठाकरे गटात पहिल्यांदाच जुंपली; नाना पटोले म्हणाले, ज्यांना आपला पक्ष सांभाळता...
चंद्रकांत खैरे यांचं 'ते' विधान झोंबल, काँग्रेस-ठाकरे गटात पहिल्यांदाच जुंपली
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2022 | 12:32 PM

बुलढाणा: ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांच्या एका विधानामुळे ठाकरे गट आणि शिवसेनेत पहिल्यांदाच जुंपली आहे. चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे 22 आमदार फुटणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) चांगलेच संतप्त झाले आहेत. ज्यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांची काळजी करू नये, असा संतप्त हल्लाबोल नाना पटोले यांनी खैरेंवर केला आहे. तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी खैरे यांनी आपलं विधान मागे घेण्याची मागणीही केली आहे. पहिल्यांदाच काँग्रेस (congress) आणि ठाकरे गटात जुंपल्याने महाविकास आघाडीत चांगलीच खळबळ उडाली आहे.

नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत. त्यांना दुसऱ्यांच्या पक्षाची काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या पक्षात पाहावं, असा हल्ला नाना पटोले यांनी खैरेंवर चढवला आहे.

शिंगे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील सरकार कोसळण्याची देवेंद्र फडणवीस यांना भीती आहे. त्यामुळे सरकार टिकून ठेवण्यासाठी त्यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार करून ठेवले आहेत.

फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे त्यांची ही धडपड सुरू आहे, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यावर पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांच्या फडणवीसांनी महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला या विधानाचाही समाचार घेतला. माझ्या मित्राचाच करेक्ट कार्यक्रम झालाय. खरं तर माझा मित्र मुख्यमंत्री असायला पाहिजे होता, परंतु त्यांचे डिमोशन झाले. त्याचे सर्वात जास्त दुःख मला आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी फडणवीस यांना डिवचले.

राज्यामध्ये हुकूमशाहीचे सरकार आहे. लोकशाहीला न मानणारे सरकार आहे. त्यामुळे भारत तोडो सरकारला हे कळणार नाही. भारत जोडो यात्रेचा उलटा परिणाम पाहायला मिळत आहे, असंही ते म्हणाले.

तोडोवाल्यांचा जोडोशी काय संबंध? त्यांच्याबद्दल फारसे बोलणे योग्य नाही. गिरीश महाजन यांनी भारत जोडो यात्रेचा परिणाम उलटा पाहायला मिळत असल्याची टीका केली होती, त्यावर पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us