AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीकांत शिंदेंच्या जागेवर भाजपाचा दावा, दीपक केसरकर म्हणतात… दावा करणं वेगळं आणि…

शिवाजी पार्कमध्ये होणारा दसरा मेळावा यंदा शिवसेनेचा होणार की शिंदेसेनेचा, या प्रश्नावरून वादंग सुरु आहे. दीपक केसरकर म्हणाले, दसरा मेळाव्याची घोषणा मुख्यमंत्री करतील.

श्रीकांत शिंदेंच्या जागेवर भाजपाचा दावा, दीपक केसरकर म्हणतात... दावा करणं वेगळं आणि...
दीपक केसरकर, शिक्षणमंत्री Image Credit source: social media
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 07, 2022 | 1:05 PM
Share

मुंबईः मिशन 2024 साठी भाजपने कंबर कसली आहे. महाराष्ट्रातील 16 लोकसभा (Loksabha) मतदार संघांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. या यादीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहेत. सध्या इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे खासदार आहेत. भाजपने या जागेसाठीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे राजकीय (Maharashtra politics) वर्तुळाच्या भुवया ताणल्या गेल्यात. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावर संयत प्रतिक्रिया दिलीय. कुणी कुठं दावा सांगावा, हे प्रत्येकाच्या मनावर असतं. पण दावा करणं म्हणजे निवडून येणं नाही.

शिवसेना-भाजप युती अभेद्य

श्रीकांत शिंदेंच्या जागेवर भाजपाच्या दाव्यावर दीपक केसरकर यांनी सावध भूमिका मांडली. ते म्हणाले, कुणीही दावा केला तरी निवडून येणं होत नाही. यामुळे शिवसेना-भाजप युतीवर परिणाम होणार नाही. ही युती अभेद्य आहे. त्यानंतर मिशन 151 कुणी काढलं? हे सर्वांना माहिती आहे.

जनतेला दुखवायचं. त्यांच्यासमोर हिंदुत्व म्हणून जायचं आणि नंतर सत्तेसाठी निष्ठा बदलायची. महाराष्ट्राच्या दृष्टीने हे कदापि सहन होणार नाही. त्यामुळे आम्ही लोकांसाठी काम करतोय. यात राजकारण करणार नाही.

सुनावणीवर काय म्हणाले?

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाची सुनावणी येत्या 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. आज यावर घटनापीठासमोर सुनावणी झाली. दीपक केसरकर म्हणाले, राज्याला जे सरकार मिळालयं, त्यांच्याकडून चांगलं काम व्हावं, अशीच गणपती बाप्पाकडे मागणी आहे.

न्यायालय निकाल देत असतं. आजच्या सुनावणीत निकाल लागला नाही. पण या प्रक्रियेवर भाष्य करणे योग्य नाही. मीडिया ट्रायल घेऊ नये, असंही म्हटलं जातंय. पण आम्ही न्यायालयाच्या प्रक्रियेवर बोलायचं नाही, असं ठरवलंय.

दसरा मेळाव्याचं काय होणार?

शिवाजी पार्कमध्ये होणारा दसरा मेळावा यंदा शिवसेनेचा होणार की शिंदेसेनेचा, या प्रश्नावरून वादंग सुरु आहे. दीपक केसरकर म्हणाले, दसरा मेळाव्याची घोषणा मुख्यमंत्री करतील. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत. त्यांच्या विचारासाठीच शिंदेंनी लढा दिलाय. त्यामुळे दसऱ्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. परंतु याबाबत काय करायचं, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. यात राजकारण केलं जाणार नाही…

श्रीकांत शिंदेंच्या जागेवर भाजपाचा दावा

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?