‘इतका इगो असेलेलं सरकार राज्याच्या इतिहासात पाहिलं नाही’, फडणवीसांचा हल्लाबोल

| Updated on: Feb 11, 2021 | 1:06 PM

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी ठाकरे सरकारवर शरसंधान साधलंय. हे अहंकारी सरकार असल्याचा घणाघात फडणवीसांनी केलाय.

इतका इगो असेलेलं सरकार राज्याच्या इतिहासात पाहिलं नाही, फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
Follow us on

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवासाला परनवानी नाकारल्यावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. राज्यपाल कोश्यारी उत्तराखंडच्या दौऱ्यासाठी निघाले असता, त्यांना विमान प्रवासाची परवानगी नसल्याचं समोर आलं. त्यामुळे विमानातून उतरुन पुन्हा राजभवनावर परतण्याची नामुष्की राज्यपालांवर ओढावली. यावरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी ठाकरे सरकारवर शरसंधान साधलंय. हे अहंकारी सरकार असल्याचा घणाघात फडणवीसांनी केलाय.(Devendra Fadnavis criticizes Thackeray government for denying permission to Governor Bhagat Singh Koshyari)

फडणवीसांचा घणाघात

“राज्यपालांना विमान प्रवास नाकारण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत. ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अपॉईंट करतात. राज्यपालांना कुठे जायचं असेल तर ते GAD ला पत्र लिहितात, ते त्याबाबत ऑर्डर काढतात. मी माहिती काढली, कालच GAD ला परवानगी दिली होती. मुख्यमंत्र्यांपर्यंतही हे पत्र पोहोचलं. पण तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या इतिहासातलं इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं, आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे, राज्यपाल संविधानिक पद आहे”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

माफी मागावी लागेल – मुनगंटीवार

राज्यपालांना विमानातून उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. इतकंच नाही तर राज्यपालांची सरकारनं क्षमा मागावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यांनी क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडलं असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावं, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

राज्यपाल उत्तराखंडला का निघाले होते?

राज्यपालांना उत्तराखंडमधील मसुरीला आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोपाला जायचं होतं. आठवड्यापूर्वी राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यलयाला परवानगी मागितली होती. मुख्यमंत्री कार्यलयाडे परवनागी मागितली होती.

मुख्यमंत्री कार्यलयाकडून शेवटपर्यंत परवानगी मिळाली नाही. राज्यपाल सरकारी विमानाने मसुरीला जाणार होते. एका आठवड्यापूर्वी त्यांनी परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी न मिळाल्याने, राज्यपाल कोश्यारी खासगी विमानाने मसुरीला रवाना झाले. आज दुपारी 12.15 च्या विमानाने ते रवाना झाले.

संबंधित बातम्या :

राज्यपाल प्रकरणी जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आवाज चढतो!

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात

Devendra Fadnavis criticizes Thackeray government for denying permission to Governor Koshyari