नगरमध्ये अभद्र युतीनंतर आता नगरसेवकांवर कारवाई

| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

अहमदनगर : महापौर आणि उपमहापौरपदासाठी अहमदनगरमध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा यांची युती झाली. या छुप्या युतीने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवली. पण आता पक्षाच्या इच्छेविरोधात झालेल्या या युतीनंतर नगरसेवकांवर कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. बहुजन समाज पक्षाच्या चार नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला मतदान केल्याप्रकरणी बसपाच्या चार नगरसेवकांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. […]

नगरमध्ये अभद्र युतीनंतर आता नगरसेवकांवर कारवाई
Follow us on

अहमदनगर : महापौर आणि उपमहापौरपदासाठी अहमदनगरमध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा यांची युती झाली. या छुप्या युतीने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवली. पण आता पक्षाच्या इच्छेविरोधात झालेल्या या युतीनंतर नगरसेवकांवर कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. बहुजन समाज पक्षाच्या चार नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे.

महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला मतदान केल्याप्रकरणी बसपाच्या चार नगरसेवकांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बसपाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच बसपाने आपले उमेदवार उभे केले होते आणि ते उमेदवार निवडूनही आले. मात्र आता त्या नगरसेवकांवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. वाचाअहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना नोटीस

अहमदनगरला राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांना महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत भाजपला मतदान केल्याप्रकरणी पक्षाकडून नोटीस आली आहे. तर याबाबत सर्व नगरसेवक मिळून निर्णय घेणार असून पक्षाला सर्व नगरसेवक एकत्रित चर्चा करून एकच उत्तर देणारं असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय. नगरसेवकांच्या उत्तरावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आम्ही भाजपला विकासाच्या मुद्यावर पाठिंबा दिला असून त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे काम करू, असं संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे. वाचाराज्याचं गणित बिघडवणाऱ्या अहमदनगर महापौर निवडणुकीतील 18 मुद्दे

महापौर निवडणुकीत नेमकं काय घडलं?

अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्याक्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ भाजपच्या पदरात पडलं. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले. त्यांना 37 मते मिळाली. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांना 23 मते मिळाली. या निवडणुकीमुळे अहमदनगरमध्ये पुन्हा सोयऱ्या धायऱ्यांचं राजकारण पाहायला मिळालं. कारण सासरे शिवाजी कर्डिलेंना जावई राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांनी मदत केली.