AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही शिव, शाहू, फुले- आंबेडकरांचा विचार सोडणार नाही, अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले

यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला त्यांनी विरोधी विचारांच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण केले.आम्हीही त्याच मताचे आहोत. महाराष्ट्रातील सीमाभाग पुन्हा आपल्यात सामील झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन साजरा होणार नाही असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही शिव, शाहू, फुले- आंबेडकरांचा विचार सोडणार नाही, अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले
ajit pawar
| Updated on: May 01, 2025 | 10:23 PM
Share

राजकारणात प्रत्येकाचे मतप्रवाह वेगळे असू शकतात परंतू त्या आड मैत्री कधी येत  नव्हती आणि त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी देखील अनेक मतभेद असताना राजकारणात सर्वांना बरोबर घेऊन काम केल आहे. आम्हीही त्यांचे वारसदार असून या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा विचार सोडणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केले आहे.

अजितदादा यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. ६५ वर्षांचा इतिहास आम्ही या कार्यक्रमात मांडला आहे. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही हा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम दरवर्षी घेत जाणार आहोत आणि यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. बेळगाव,कारवार सह निपाणी हा मराठी बहुल भाग महाराष्ट्रात अजून आलेला नाही. त्यामुळे जेव्हा तो प्रदेश आपल्यासोबत येणार तेव्हाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन साजरा होणार असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

चायना आणि जपान त्यांच्या बुलेट ट्रेनमुळे पुढे गेले

आजचे युग एआयचे युग आहे. आज भावे साहेबांनी इथे बोलत असताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या राज्याला अनेक मुख्यमंत्री लाभले आहेत. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपली लोकसंख्या ३५ कोटी होती. आता देशभराची लोकसंख्या १४० कोटी आहे. याचा विचार झाला पाहिजे असे अजितदादा यावेळी म्हणाले. विरोधक बुलेट ट्रेन नको आणि बाकी काम करा अशी टीका करीत आहेत. परंतू चायना आणि जपान हे त्यांच्या बुलेट ट्रेनमुळे पुढे गेले आहेत. तेथे जे बदल झाले आहेत ते आपण मान्य केल पाहिजे असेही असेही अजितदादा असेही अजितदादादा यांनी यावेळी म्हटले.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.