AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही शिव, शाहू, फुले- आंबेडकरांचा विचार सोडणार नाही, अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले

यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला त्यांनी विरोधी विचारांच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण केले.आम्हीही त्याच मताचे आहोत. महाराष्ट्रातील सीमाभाग पुन्हा आपल्यात सामील झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन साजरा होणार नाही असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही शिव, शाहू, फुले- आंबेडकरांचा विचार सोडणार नाही, अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले
ajit pawar
| Updated on: May 01, 2025 | 10:23 PM
Share

राजकारणात प्रत्येकाचे मतप्रवाह वेगळे असू शकतात परंतू त्या आड मैत्री कधी येत  नव्हती आणि त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांनी देखील अनेक मतभेद असताना राजकारणात सर्वांना बरोबर घेऊन काम केल आहे. आम्हीही त्यांचे वारसदार असून या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा विचार सोडणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केले आहे.

अजितदादा यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. ६५ वर्षांचा इतिहास आम्ही या कार्यक्रमात मांडला आहे. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही हा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम दरवर्षी घेत जाणार आहोत आणि यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. बेळगाव,कारवार सह निपाणी हा मराठी बहुल भाग महाराष्ट्रात अजून आलेला नाही. त्यामुळे जेव्हा तो प्रदेश आपल्यासोबत येणार तेव्हाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन साजरा होणार असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

चायना आणि जपान त्यांच्या बुलेट ट्रेनमुळे पुढे गेले

आजचे युग एआयचे युग आहे. आज भावे साहेबांनी इथे बोलत असताना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या राज्याला अनेक मुख्यमंत्री लाभले आहेत. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपली लोकसंख्या ३५ कोटी होती. आता देशभराची लोकसंख्या १४० कोटी आहे. याचा विचार झाला पाहिजे असे अजितदादा यावेळी म्हणाले. विरोधक बुलेट ट्रेन नको आणि बाकी काम करा अशी टीका करीत आहेत. परंतू चायना आणि जपान हे त्यांच्या बुलेट ट्रेनमुळे पुढे गेले आहेत. तेथे जे बदल झाले आहेत ते आपण मान्य केल पाहिजे असेही असेही अजितदादा असेही अजितदादादा यांनी यावेळी म्हटले.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.