सोमय्या-राऊत वादात कोर्लईच्या सरपंचानं खरं खोटं सांगितलं, त्या 19 बंगल्याचं गौडबंगाल पहिल्यांदाच उघड

| Updated on: Feb 16, 2022 | 3:25 PM

सकाळीच सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत. त्या बंगल्याचा टॅक्स मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी भरल्याचा दावा केला. मात्र याबाबत कोलई गावच्या संरपंचांना आम्ही विचारले असता. किरीट सोमय्यांचे आरोप खोटे असल्याचे या सरपंचांनी सांगितले आहे.

सोमय्या-राऊत वादात कोर्लईच्या सरपंचानं खरं खोटं सांगितलं, त्या 19 बंगल्याचं गौडबंगाल पहिल्यांदाच उघड
Follow us on

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya)आरोपांना उत्तर देताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) बंगले कुठे आहेत? हे दाखवावं असे आवाहन सोमय्यांना केले होते. त्यानंतर सकाळीच सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत. त्या बंगल्याचा टॅक्स मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी (Rashmi Thackeray) भरल्याचा दावा केला. मात्र याबाबत कोलई गावच्या संरपंचांना आम्ही विचारले असता. किरीट सोमय्यांचे आरोप खोटे असल्याचे या सरपंचांनी सांगितले आहे. तसेच ती घरं अन्वय नाईक यांनी बांधली होती, अशी exclusive माहिती tv9 मराठीला त्यांनी दिली आहे. 19 बंगले नाही तर 18 घरं बांधली, त्यानंतर सीआरझेडमधली कच्ची घरं तोडली गेली. आणि 2014 ला ही जमीन मनिषा वायकरांना विकली, अशी माहिती सरपंचांनी दिली आहे. याच बंगल्यांवरून राज्यात सध्या मोठा पॉलिटीकल राडा सुरू आहे. सोमय्या जे बंगले सांगत आहेत ते बंगले अस्तित्वातच नाही, आपण जाऊन पिकनिक काढून पाहून येऊ असे संजय राऊत मंगळवारच्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यानंतर हा बंगल्यांचा वाद पोकसमध्ये आलाय.

सरपंच प्रशांत मिसळ काय म्हणाले?

 सोमय्यांचे आरोप काय?

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, घर नाही तर घरपट्टी का भरतात. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायचंय. मुख्यमंत्री झाल्यानंतर घरपट्टी भरलीय. त्याचं 5.42 लाख असं ग्रामपंचायतीनं व्हॅल्युएशन दाखवलंय. 2008 मध्ये व्हिजीट करून घरं बांधून झाली. तुम्ही एग्रीमेन्ट 2014 मध्ये केलं. मुख्यमंत्र्यांनी 12 नोव्हे 2020 ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घरं चोरीला गेली का, असा सवाल त्यांनी केलाय. शिवाय मी 12 महिन्यांपूर्वीच घरं चोरीला गेल्याची तक्रार केली. मग आता घरं नाहीत, अशी नाटकं का करता. ठाकरेंच्या पत्नीनं, रवींद्र वायकरांनी, घोस्ट घरं दाखवून कोट्यवधी लाटले असा आरोपही सोमय्यांनी केलाय. किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, 31 मार्च 2021 पर्यंत अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे, मनीषा वायकर कर भरत आहेत. याचा अर्थ जागा केव्हा घेतली रश्मी आणि मनिषा यांनी 2013 मध्ये एमओयू केलं. जेव्हा वायकर स्थायी समितीचे अध्यक्ष होते. हा ग्रामपंचायतीचा अधिकारय. जो ‘आरटीआय’मधून समोर आला. रश्मी आणि मनीषा यांच्यातर्फे 30 जाने 2019 रोजी घरपट्टी त्यांच्या नावे करण्याचा अर्ज आला आहे. आणि ग्रामपंचायत त्यांचा अर्ज मान्य करून घरं करत आहेत, अशी माहिती सोमय्यांनी सकाळीच दिली आहे.

Video | महाराष्ट्राचं डोकं गरगरलं! सोमय्या म्हणतात, ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरतायत तेच चोरीला ! कसे?

जोड्यानं मारू मला म्हणताय की रश्मी ठाकरेंना? 19 बंगल्यावरून राऊतांना किरीट सोमय्यांचा सवाल, पुरावेच दिले!

Kirit Somaiya | 400 कोटीला मारा गोळी, सोमय्या मुलाच्या कनेक्शवर बॅकफूटवर? तो छोटा प्रोजेक्ट असल्याचा दावा