‘वैयक्तिक टीका कराल तर उत्तर मिळणारच’, नारायण राणेंना शिवसेना नेत्यांचा इशारा

| Updated on: Aug 27, 2021 | 6:08 PM

राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झालीय. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यानंतर आता शिवसेना नेते उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना इशारा दिलाय.

वैयक्तिक टीका कराल तर उत्तर मिळणारच, नारायण राणेंना शिवसेना नेत्यांचा इशारा
केंद्रीय मंत्री नारायण राणे
Follow us on

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक आणि जामीनावर सुटका, या घडामोडीनंतर राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झालीय. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यानंतर आता शिवसेना नेते उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना इशारा दिलाय. संघर्ष टाळण्यासाठी तशाच पद्धतीने वागलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे. आमची भूमिका प्रामाणिक आहे. जशी अॅक्शन तशी रिअॅक्शन व्यक्त होत असते, अशा शब्दात उदय सामंत याांनी राणेंना इशारा दिलाय. (Uday Samant and Vaibhav Naik warn Narayan Rane)

जन-आशीर्वाद कुणी काढावी हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्यांना केंद्रीय स्तरावरून सांगितलं असेल. पण आम्ही ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाला मानणारे नेते आहोत. उद्धव साहेबांना मानणारे नेते आहोत. उद्धव साहेब आमचं दैवत आहेत. त्यांच्यावर टीका होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. संयम पाळला पाहिजे. तशी टीका झाली तर त्याचे परिणाम काय होतात हे चार दिवसांपूर्वी प्रत्येकाने बघितलं आहे, असा टोलाही सामंतांनी यावेळी लगावलाय. टीका जरी पुन्हा सुरू झाली असली तरी प्रत्येकाने संयमाने वागलं पाहिजे. जशी अॅक्शन तशी रिअॅक्शन व्यक्त होत असते. चांगल्या पद्धतीची अॅक्शन झाली तर रिअॅक्शनही तशी असेल, असंही सामंत म्हणाले. सिंधुदुर्गात जे दाखल होत आहेत त्यांनी जनतेचा आशीर्वाद घ्यावा. इंधन, गॅसचे दर कधी कमी होणार हे त्यांनी सांगावं. GST चा परतावा कधी मिळणार हे त्यांनी सांगावे, अशी टोलेबाजी सामंतांनी केलीय.

‘यात्रा ही आशीर्वाद घेण्यासाठीच असावी’

राणेंनी केलेल्या वैयक्तिक टीकेलाही सामंत यांनी उत्तर दिलंय. अशा पद्धतीची टीका यापूर्वीही झाली होती. त्यातूनही उद्धव ठाकरेंनी काम केलेले आहे. कोव्हीडच्या काळात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा आदर्श देशाने घेतला आहे. त्याचे सगळ्याच पक्षांनी कौतुक केलं पाहिजे. वैयक्तिक टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासासाठी काय हवे हे जनआशीर्वाद यात्रेत सांगितले पाहिजे. जे काही विधान झालं त्यांनतर त्याची काय प्रतिक्रिया उमटली ते देशाने पाहिलं आहे. त्यानंतर काही केंद्रीय नेत्यांचे फोन आले. हा विषय घडला त्यावर काय रिअॅक्शन येते हे शिवसैनिकांनी दाखवून दिले. जनआशीर्वाद यात्रा ही आशीर्वाद घेण्यासाठीच असावी, असंही सामंत म्हणाले.

वैभव नाईकांचाही राणेंना इशारा

सुरुवातीलाच सांगितलं आहे की उद्धवजींवर टीका झाली तर त्याच पद्धतीनं उत्तर दिले जाईल. त्यावर आम्ही ठाम आहोत. पण आता बघितलं तर रत्नागिरीपासून सिंधुदुर्गात येईपर्यंत नाव न घेता टीका सुरू झालीय. पण सिंधुदुर्गात येईपर्यंत टीकाच होणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असा टोला वैभव नाईक यांनी राणेंना लगावलाय. टीका झालीच तर त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिलाय. उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन टीका झाली तर संयम राहणार नाही, असंही नाईक म्हणाले.

संबंधित बातम्या :

दोन राऊतच शिवसेनेला पार खोल डुबवणार, नारायण राणेंचा हल्लाबोल

आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ; नारायण राणे कडाडले

Uday Samant and Vaibhav Naik warn Narayan Rane