
मुंबई – मुंबई महापालिकेवरती (Brihanmumbai Municipal Corporation) आत्तापर्यंत अनेकांनी एकहाती सत्ता आणण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवसेनेच्या (Shivsena) हाती अनेक वर्षांपासून पालिकेची सत्ता आहे. राज्यातल्या अनेक पालिकेच्या मुदती संपल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्याअनुशंगाने महाराष्ट्रातल्या (Maharashtra) अनेक पक्षांनी मुंबईत आत्तापासून आपली फिल्डींग लावायला सुरूवात केली. राज्यातलं राजकारण अनेक दिवसांपासून गरम आहे. त्याचे परिणाम आता होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीवरती होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यापासून पालिकेवरती आत्ता कोणाचा झेंडा फड़कणारा याबाबत लोकांना देखील शंका आहे. तसेच महाविकास आघाडीच्या मदतीने शिवसेना पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. पालिकेच्या निवडणुकीच्या अनुशंगाने भाजप आणि शिवसेनेत मोठा संघर्श सुरू आहे.
मुंबई प्रत्येक वार्ड निहाय अनेक पक्षांनी आत्तापासून आपली कंबर कसायला सुरूवात केली आहे. सध्या मुंबई महापालिकेवरती शिवसेनेची सत्ता आहे. परंतु सत्ता हिसकावण्यासाठी विरोधक टपून बसले आहेत अशी राजकीय परिस्थिती आहे. त्यामुळे सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार ? सत्ता कोणाकडे जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मागच्या झालेल्या निवडणुकीत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक ३८ मागासवर्गीयांसाठी राखीव होता. त्यावेळी तिथं आठ उमेदवारांनी आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. तो मतदार संघ १८३१८ मतदारांचा आहे. तिथं शिवसेनेचा उमेदवार निवडून आला.
भारतीय जनता पक्षाच्या भरडकर सुधीर तुकाराम यांना 2438 मत मिळाली.
कॉंग्रेस पार्टीच्या वैभव हेमंत भरडकर यांना 2854 मत मिळाली.
शिवसेनेचे उमेदवार आत्माराम लक्ष्मण चाचे यांना 6416 मतं मिळाली.
पक्ष उमेदवार (Candidate) विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर