AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2026 : भाजपचा नवाब मलिक यांना विरोध मावळला का? देवेंद्र फडणवीस यांचं पालिका निवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य

BMC Election 2026 : "अनेकांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा असू शकतात. अनेक प्रभागात अनेक चांगले कार्यकर्ते आहेत. पण शेवटी काही लोकांनाच आपण तिकीट देऊ शकणार आहोत. आज आपण संकल्प करण्याची आवश्यकता आहे"

BMC Election 2026 :  भाजपचा नवाब मलिक यांना विरोध मावळला का? देवेंद्र फडणवीस यांचं पालिका निवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य
Devendra fadnavis
| Updated on: Dec 25, 2025 | 4:03 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. मुंबई महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई महापालिकेत महायुती 227 जागांवर लढणार हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलय. मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भात वर्षा बंगल्यावर एक बैठक झाली. मुंबईतील सहा विभागांचा या बैठकीत आढावा घेण्यात येणार असल्याचं समजतय. याच बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिकेचा सर्व आढावा घेणार अशी माहिती आहे. आजच्या बैठकीत भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. मागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपावर बोलणी सुरु आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा सोबत घेणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण मुंबईत पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला सोबत न घेण्यासाठी भाजपने नवाब मलिक यांचं कारण पुढे केलं होतं. नवाब मलिक यांना भाजपचा विरोध आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना सोबत निवडणूक लढतील. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल असं म्हटलं जात होतं. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून मुंबई पालिकेची निवडणूक लढणार असं म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला असलेला भाजपचा विरोध मावळला का? शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार का? अशी चर्चा सुरु झालीय.

काही जागा ते लढतील, काही आपण लढू

“निवडणुकांमध्ये २२७ जागा आहेत. आपला मित्र पक्ष शिवसेना आहे. महायुती करणार आहोत. काही जागा ते लढतील, काही आपण लढू. अनेकांच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा असू शकतात. अनेक प्रभागात अनेक चांगले कार्यकर्ते आहेत. पण शेवटी काही लोकांनाच आपण तिकीट देऊ शकणार आहोत. आज आपण संकल्प करण्याची आवश्यकता आहे. तिकीट मिळो अथवा न मिळतो, आपण अटलजींच स्वप्न साकार करण्यासाठी मैदानात उतरायचं आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?