Presidential Election | नितीन राऊतांचे मत बाद करा, भाजप आमदार बबनराव लोणीकरांची मागणी कशासाठी?

| Updated on: Jul 18, 2022 | 2:07 PM

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून 200 पेक्षा जास्त आमदारांचं मत मिळेल, असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

Presidential Election | नितीन राऊतांचे मत बाद करा, भाजप आमदार बबनराव लोणीकरांची मागणी कशासाठी?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः मतदानासाठी माझा नंबर असताना काँग्रेस आमदार नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मध्येच येऊन माझ्याआधी मतदान केलं. त्यामुळे त्यांचं मतदान रद्द करण्यात यावं अशी मागणी भाजप नेते बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी केली आहे. देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक घेतली जात आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि विरोधी गटाकडून यशवंत सिन्हा या दोन उमेदवारांमध्ये ही लढत होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावणाऱ्या काँग्रेसच्या नितीन राऊत यांचं मत बाद करा, अशी मागणी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. दरम्यान, एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी महाराष्ट्रातून 200 पेक्षा जास्त आमदारांची मते मिळतील, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

लोणीकरांचे आरोप काय?

भाजप आमदारांनी साडेनाऊ वाजेपासून मतदान करण्यासाठी हजेरी लावली होती. मात्र नितीन राऊत यांनी मध्येच येऊन मतदान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेस आमदार नितीन राऊत यांच्यावर आरोप करताना बबनराव लोणीकर म्हणाले, माझा पहिला नंबर होता. आम्ही एक तास रांगेत उभे राहिले. नितीन राऊत हे अर्धा तास आतमध्ये जाऊन बसले होते. माझं मतदान पहिलं असताना राऊत यांनी मध्येच येऊन मतदान केलं. रांगेतून असं आतमध्ये जाऊन बसता येत नाही. त्यामुळे त्यांचं मतदान रद्द करण्यात यावं, अशी मागणी मी निवडणूक आयोगाकडे करणार आहे.. यासंदर्भातील व्हिडिओ फुटेजदेखील असल्याचं बबनराव लोणीकरांनी म्हटलं.य

नितीन राऊत काय म्हणाले?

पहिलं मतदान करण्याची संधी प्राप्त झाली. काँग्रेस आघाडीच्या पसंतीला मी मतदान केलं. आमची आघाडी आहे. माझ्या पक्षाने जे आदेश दिले त्यानुसार मतदान केलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सिन्हा यांना चांगलं मतदान मिळवून देऊ, असं वक्तव्य काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी केलं.

‘अंतर्रात्म्याचा आवाज ऐकून मतदान होईल’

दरम्यान,  यावेळी मते फुटणार नाहीत तर पार्टीच्या नेराष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून 200 पेक्षा जास्त आमदारांचं मत मिळेल, असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी आज अंतरात्म्याचा आवाज ऐकला जाईल. बसमधून आमदार आणल्याच्या नाना पटोलेंच्या आरोपांवर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचेही अनेक आमदार बससमधून आणले जातात. राजस्थानमध्ये काँग्रेस आमदार बसमधूनच आणले जातात, नानांना माहित नाही का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.