AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नका, अजितदादांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण जीवीतहानीही मोठ्या प्रमाणात आहे. असे असतानाही अद्यापपर्यंत मदत ही पोहचलेली नाही. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. शिवाय खरीप हंगामातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदतीच्या अनुशंगाने पीक पंचनामे होणे गरजेचे असताना स्थानिक पातळीवरील यंत्रणा अद्यापही कामाला लागेलेली नाही.

Ajit Pawar : राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नका, अजितदादांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नये आणि अतिवृष्टीने नुकासान झालेल्यांना मदत मिळावी अशी मागणी विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 18, 2022 | 1:35 PM
Share

मुंबई : राज्यात सत्तांतर होताच (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (MVA) महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका सुरु केला होता. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयावर बोट ठेवत त्यांना स्थगिती दिली जात होती. त्यामुळे विकास कामांमध्ये राजकारण न आणता कामांना स्थगिती देऊ नये या मागणीसाठी विरोधकांनी विरोधी पक्षनेते (Ajit Pawar) अजित पवार यांच्या नेतृत्वात सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवाय राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जीवीतहानी तसेच वित्तहानीही झाली आहे. मृतांच्या कुटुंबियांना अजूनही आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नगरविकास विभागांच्या कामांना स्थगिती

महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयावर शिंदे सरकारचे विशेष लक्ष आहे. शिंदे सरकारनं 941 कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे. यामध्ये अधिकचा निधी हा बारामती नगरपरिषदेसाठीच होता. शिंदे सरकारने केवळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती दिली आहे. शिवसेना आमदारांनी सुचवलेल्या कामांना मात्र अभय दिले आहे. त्याच अनुशंगाने विरोधी पक्षातील नेत्यांनी विधानभवनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विकास कामांना स्थगिती देऊन नये अशी मागणी केली आहे.

अतिवृष्टीने नुकसान, मदतीची गरज

राज्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण जीवीतहानीही मोठ्या प्रमाणात आहे. असे असतानाही अद्यापपर्यंत मदत ही पोहचलेली नाही. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. शिवाय खरीप हंगामातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदतीच्या अनुशंगाने पीक पंचनामे होणे गरजेचे असताना स्थानिक पातळीवरील यंत्रणा अद्यापही कामाला लागेलेली नाही. नुकसानीच्या तुलनेत मदतकार्य झाले नसून गरजूंना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे.

कॉंग्रेस नेत्यांचेही मुख्यमंत्र्यांना निवेदन

1. अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत

2. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती प्रती हेक्टरी 50 हजार रु, बागायती शेतकऱ्यांना 1 लाख रु प्राथमिक मदत तत्काळ द्यावी

3. वाढीव वीजदराला स्थगिती

4. विकास योजना आणि विकास कामांना दिलेली स्थगिती तत्काळ उठवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Follow Us
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं