Saamana : जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष सुरू, सामना अग्रलेखातून भाजपला टोला

| Updated on: Jun 13, 2022 | 7:40 AM

राज्यसभेची निवडणुक जशी भाजपाला महत्त्वाची होती. तशीचं ती महाविकास आघाडीला देखील महत्त्वाची होती. महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं जे काही चित्र रंगवलं जात आहे.

Saamana : जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष सुरू, सामना अग्रलेखातून भाजपला टोला
जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष सुरू
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्यसभेचे मतदान (Voting) राजकीय पक्षांसाठी खुल्या पद्धतीने होते. तरीही जे व्हायचे होते ते झाले. म्हणजे घोडाबाजार झाला. आता विधानपरिषदेची निवडणुक होणार आहे. ती गुप्तपद्धतीने निवडणुक होणार आहे. त्यामुळे अनेकांना नव्याने कोंब फुटला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा अशा पद्धतीने वापर व्हावा हे योग्य नाही. तसेच लोकशाहीसाठी चांगलं देखील नाही. राज्यसभेची सहावी जागा भाजपने (BJP) जिंकून दाखवली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण त्यामुळे आकाश कोसळलं आहे काय ? मुंगीने मेरू गिळला काय ? असे अजिबात झाले नाही अशी टीका आजच्या सामना (Saamana) अग्रलेखातून करण्यात आली आहे.

आमदारांची मतं मिळवून जिंकायचं आमचा प्लॅन होता

राज्यसभेची निवडणुक जशी भाजपाला महत्त्वाची होती. तशीचं ती महाविकास आघाडीला देखील महत्त्वाची होती. महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं जे काही चित्र रंगवलं जात आहे. ते अत्यंत चुकीचं आहे, कारण आमच्यात असं काही नाही. चार पाच अपक्षांना हाताशी धरून आणि बहुजन विकास आघाडीच्या आमदारांची मतं मिळवून जिंकायचं आमचा प्लॅन होता. तसाच प्लॅन भाजपाचा देखील होता. राज्यसभेची सहावी जागा त्यांनी जिंकली. त्यामुळे ते जल्लोष करीत आहेत. जो जिता वोही सिंकदर या न्यायाने सिंकदरांचा जल्लोष व उत्सव सुरू आहे. निवडणूक जिंकल्याने त्यांनी काही मोठा चमत्कार घडविला आहे अशा पद्धतीने अंगारे-धुपारे फिरवले जात आहेत.

भाजपकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहेत

आजच्या सामानाच्या अग्रलेखात निवडणूकीत सहावी जागा जिंकल्यानंतर भाजपाने काय केल त्याचा ऊहापोह घेण्यात आला आहे. ज्या पद्धतीने भाजपकडून बातम्या पेरल्या जात आहेत. त्या अत्यंत चुकीच्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत गणिताचं चातुर्य दाखवलं. पण आमच्या आजही बहुमत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांनी अनिल देखमुख आणि नवाब मलिक यांनी मतदान करू दिलं नाही.

हे सुद्धा वाचा

केंद्राच्या यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरल्या जात आहेत अशी टीका देखील करण्यात आली आहे.