नेहमी पाठीशी उभा राहणारा बंजारा समाज संजय राठोडांची साथ सोडणार आणि…

| Updated on: Sep 19, 2022 | 12:11 AM

राज्यातील 50 ते 60 टक्के बंजारा समाजाच्या बांधवांनी संजय राठोड यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

नेहमी पाठीशी उभा राहणारा बंजारा समाज संजय राठोडांची साथ सोडणार आणि...
Follow us on

मुंबई : शिंदे गटातील मंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड(Sanjay Rathore) यांना जबरदस्त झटका बसणार आहे. नेमही पाठीशी उभा राहणारा बंजारा समाज(Banjara Samaj ) संजय राठोडांची साथ सोडणार आहे. 50 ते 60 टक्के बंजारा समाज उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील 50 ते 60 टक्के बंजारा समाजाच्या बांधवांनी संजय राठोड यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बंजारा समाजाने शिवबंधन बांधून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या तीन दिवसात बंजारा समाजाचे लोक मातोश्रीवर जाउन शिवबंधन हातावर बांधणार आहेत. हे सर्व उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत शिवसेनेचा भगवा हातात घेणार आहेत.

बंजारा समाजाने शिवसेनेत प्रवेश केल्यास संजय राठोड यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. यामुळे संजय राठोड यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

संजय राठोड याचे बंजारा समाजात विशेष स्थान आहे. शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 1997 मध्ये वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते यवतमाळ शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष झाले होते.

विशेष म्हणजे संजय राठोड यांनी 2004 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते माणिक ठाकरे यांचा पराभव केला. यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळाली. 2009 मध्ये त्यांनी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला. यानंतर शिवसेना पक्षात त्यांचे महत्त्व वाढले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना वनमंत्री पद देण्यात आले. मात्र, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांना मंत्रीपद सोडावे लागले.

यानंतर ते बंडखोर एकनाथ शिंदे गटात सामिल झाले. त्यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आले आहे.