‘ह्या’ दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं, शहाजीबापू पाटलांनी भर सभेत मनातली खदखद बोलून दाखवली

शहाजीबापू पाटील यांनी राज्याच्या राजकारणातील दोन राऊतांवर निशाणा साधलाय. वाचा...

ह्या दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं, शहाजीबापू पाटलांनी भर सभेत मनातली खदखद बोलून दाखवली
शहाजीबापू पाटील
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 16, 2022 | 11:28 AM

महेश सावंत, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग : शिंदेगटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आताही त्यांनी अशाच त्यांच्या रोखठोक आणि हटके शैलीत राज्याच्या राजकारणातील दोन राऊतांवर निशाणा साधलाय. संजय राऊत (Sanjay Raut) आणि विनायक राऊतांवर (Vinayak Raut) शहाजीबापूंनी निशाणा साधलाय. ते सिंधुदुर्गात बोलत होते.

भाजपचे नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील उपस्थित होते. तेव्हा त्यांनी जोरदार बॅटिंग केली.

शहाजीबापू काय म्हणाले?

दोन राऊतांवर माझा लई राग हाय…या दोन राऊतांनी आमचं सगळं वाटोळं केलंय, असं म्हणत शहाजीबापूंनी संजय राऊत आणि विनायक राऊतांवर निशाणा साधलाय.

लोकसभेच्या निवडणुकीला कोकणात येऊन धुरळा पाडणार.निलेश राणे तुम्ही येऊ नका म्हणालात तरी मी येणार… संजय राऊत निवडणुकीला उभा राहत नाही नाहीतर तिथं पण गेलो असतो. राऊतांचा निवडणुकीततील पराभव अटळ आहे, असं शहाजीबापू म्हणालेत.

सिंधुदुर्गातील कुडाळमधील एका जाहीर कार्यक्रमात शहाजीबापू पाटलांनी भाषण केलं. तेव्हा त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. यावेळी माजी खासदार निलेश राणेदेखील स्टेजवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शहाजीबापूंचं भाषण झालं. तेव्हा त्यांनी हे विधान केलं.

ऐतिहासिक परंपरा असलेल्या चिन्हावर शिखांनी दावा टाकणं चुकीचं आहे, असं म्हणत बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या चिन्हावर शिख समाजाने घेतलेल्या आक्षेपावर शहाजीबापू पाटील यांनी आपलं मत मांडलं.

ढाल-तलवार छत्रपती शिवाजी महाराजांची आहे.आमचं हिंदवी स्वराज्य मावळ्यांनी उभं केलं. ते ढाल-तलवार हातात घेऊनच उभं केलं आहे.आज शिखांनी आक्षेप घेतला. उदया राजस्थानमधील राजपूत म्हणतील नंतर कर्नाटकातील रेड्डी म्हणतील भावना दुखावल्या. पण त्यांना मी सांगू इच्छितो की हे आमचं चिन्ह आहे आणि आमचंच राहणार, असंही शहाजीबापू म्हणालेत.