AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विकासावर बोलायला जागा नाही, विरोधकांकडून जातीचं विष पेरलं जातंय : पंकजा मुंडे

बीड : लोकसभेच्या रिंगणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. बीडमध्येही मुंडे बहीण-भावांमध्ये हाच प्रकार सुरु आहे. पण विरोधकांकडे विकासावर बोलण्यासाठी काहीही नसल्यामुळे आता जातीचं विष पेरलं जातंय, अशी खंत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन विरोधक समाजामध्ये जातीभेदाचे विष पेरण्याचे पाप करीत आहेत. मात्र आता जातीपेक्षा देशहिताला प्राधान्य देण्याची गरज आहे. […]

विकासावर बोलायला जागा नाही, विरोधकांकडून जातीचं विष पेरलं जातंय : पंकजा मुंडे
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

बीड : लोकसभेच्या रिंगणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. बीडमध्येही मुंडे बहीण-भावांमध्ये हाच प्रकार सुरु आहे. पण विरोधकांकडे विकासावर बोलण्यासाठी काहीही नसल्यामुळे आता जातीचं विष पेरलं जातंय, अशी खंत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन विरोधक समाजामध्ये जातीभेदाचे विष पेरण्याचे पाप करीत आहेत. मात्र आता जातीपेक्षा देशहिताला प्राधान्य देण्याची गरज आहे. सामान्य माणसालाही नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटते. म्हणून आपणही कोणत्याही चुकीच्या प्रचाराला बळी न पडता डॉ. प्रितम मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी वकील संघाला केलं.

पंकजा मुंडे यांनी आज वकील संघाच्या कार्यालयात वकिलांशी संवाद साधला. प्रारंभीच मी भाषण नाही तर संभाषण करायला आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्या म्हणाल्या, मी कुणालाही न दुखावता राजकारण करते. मुंडे साहेबांनी आयुष्यात कधी जात पाहिली नाही आणि आम्ही बहिणींनी कधी जात पाहिली नाही. मात्र विकासावर बोलण्यासाठी राष्ट्रवादीकडे बोलण्यासारखं काही नसल्याने त्यांनी पातळी सोडून प्रचार सुरू केलाय. मात्र आता जातीपेक्षा देशहित महत्त्वाचं आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही सामान्य माणसाची इच्छा आहे, आपणही देशहितासाठी आशीर्वाद द्यावेत, असं त्या म्हणाल्या.

जिल्ह्यातील विकासकामांबाबतही पंकजांनी माहिती दिली. परळी – बीड – नगर रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. रेल्वे मार्ग झाला की उद्योग वाढतील. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांचं जाळं तयार झालंय. त्यामुळे विकासाला गती आली आहे. आगामी काळात कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याला मिळविण्यासाठी आणि गोदावरीचे पाणी सिंधफणा नदीत आणण्यासाठी नियोजन चालू आहे. विकासाच्या बाबतीत आम्ही बहिणी कमी पडणार नाहीत, कारण मी चमचेगिरी करून पुढे आलेले, नाही असं सांगून स्वाभिमानी जनता आपल्या लेकीला ऐतिहासिक मताधिक्य देऊन विजयी करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लेक म्हणून आपण प्रितम मुंडे यांच्या पाठीशी आपले मतदानरुपी आशीर्वाद कायम ठेवा, असंही त्या म्हणाल्या.

बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडून एकमेकांमध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपकडून बीडसाठी विद्यमान खासदार प्रितम मुंडे या उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. बीडसह बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या जागांसाठी 18 तारखेला मतदान होणार आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.