Udhav Thackeray : अशांना हाताळणारे खुप आहेत, नवनीत राणांच्या ‘तमाशा’वर मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

| Updated on: May 01, 2022 | 2:32 PM

दावेदार हा शब्द चुकीचा आहे. हिंदुंना असमर्थ किंवा नासमज समजू नका. त्यांना सर्व कळतं. हिंदु म्हणजे कोण कोणी परदेशातून आले नाही. आपल्याकडे हिंदू अनेक भाषा बोलतात.

Udhav Thackeray : अशांना हाताळणारे खुप आहेत, नवनीत राणांच्या तमाशावर मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा
नवनीत राणांच्या 'तमाशा'वर मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई – “त्यांना हाताळणारे हात खूप आहेत. माझ्याकडे, त्यांच्यापासून त्यांना वाचायचं आहे. त्याच्यात मी कमी पडतोय का अशी मला भीती वाटते. कारण अशा लोकांना (people) हाताळणारे खूप आहेत. लाखो करोडो हात आहेत. त्यामुळे त्यांना हाताळण्याची चिंता नाही. त्यांचा वाचवण्याची मला चिंता वाटते. हेच तर मला म्हणायचं आहे. हे तमाशे कशासाठी पाहिजेत. अचानक असं काय झालेलं आहे. की एकदम तुम्हाला हनुमान चाळीसा (Hanuman Chalisa) आठवायला लागला आहे. किंवा आता या वातावरणात असं काय तुम्हाला वाटलं हे केलं पाहिजे. हेचं तर माझं मत आहे की, प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आपल्यासमोर संकटं कमी नाही आहेत. ती येतचं आहेत” अशी टीका उद्धव ठाकरेंनी (Udhav Thackeray) नवनीत राणांवरती केली.

उलट भाजपाला समजत नाही की करायचं काय

आज लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांना अनेक विषयांवरती प्रश्न विचारण्यात आले. अनेक पु्श्नांची त्यांनी मुलाखतीत स्पष्ट उत्तर दिली. कुठे फरफडत गेलोय मी, उलट भाजपाला समजत नाही की करायचं काय. कारण शिवसेना त्यांच्याबरोबर जाणार होती. त्यावेळेला राष्ट्रवादी दोन दिवसात चालली होती. कॉंग्रेसचे आमदार फुटणार होते. आता त्याला अडीच वर्षे झाले. ईडी हे सगळं असं सुरू झालंय. ही तुमची थेर सुरू आहेत. माझ्या झोपडपट्टीतल्या कार्यकर्त्यावरती धाड टाकली. अशा पद्धतीचं राजकारण आपल्या लोकांनी कधी पाहिलेलं नाही अशा पध्दतीची टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवरती केली.

हे सुद्धा वाचा

हिंदुंना असमर्थ किंवा नासमज समजू नका.

दावेदार हा शब्द चुकीचा आहे. हिंदुंना असमर्थ किंवा नासमज समजू नका. त्यांना सर्व कळतं. हिंदु म्हणजे कोण कोणी परदेशातून आले नाही. आपल्याकडे हिंदू अनेक भाषा बोलतात. आम्ही मराठी मग बाकीच्यांना हकलून द्यायचं मग ते फसलं की आम्ही हिंदू. इतरांना घरात बोलवायचं. हे जे चाळे चालतात त्यांना माकड चाळे म्हणतात. महाराष्ट्रातील जनता ना समज नाही असंही एका प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले.