AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : प्रार्थना केल्यानं नाही तर मेहनतीमुळे मिळतं यश, यशस्वी व्हायचंय? मग या गोष्टींपासून दूरच रहा

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसाने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे? आणि काय करू नये? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहेत.

Chanakya Niti : प्रार्थना केल्यानं नाही तर मेहनतीमुळे मिळतं यश, यशस्वी व्हायचंय? मग या गोष्टींपासून दूरच रहा
Chanakya Niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 11, 2026 | 8:53 PM
Share

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य तीनी नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हायच असेल तर त्याने काय केलं पाहिजे? आणि काय करु नये? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो माणूस आळशी असतो तो आपल्या आयुष्यात काहीही करू शकत नाही. यश तर अशा लोकांसाठी फार दूरची गोष्ट असते. त्यामुळे तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी आळस झटकून टाका आणि मेहनत करा. मेहनत ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला यशाच्या द्वारापर्यंत घेऊन जाते. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर कठोर मेहनतीला पर्याय नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. पुढे चाणक्य असं देखील म्हणतात की तुम्ही जर नुसतीच मेहनत करत असाल तर त्याला देखील काही अर्थ नाही, कारण यशस्वी होण्यासाठी योग्य दिशेनं मेहनत, कष्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या कामामध्ये सातत्य हवं, तर आणि तरच तुम्ही यशस्वी व्हाल. दरम्यान अशा देखील काही गोष्टी आहेत, जर तुम्हाला यशस्वी व्हायच असेल तर या गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संगत – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाहीच. मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये आहात? जर तुम्ही वाईट लोकांच्या संगतीमध्ये असाल तर तुम्ही आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. तुमचा एखादा कितीही जवळचा मित्र असू द्या, मात्र तो जर वाईट संगतीच्या आहारी गेला असेल तर अशा व्यक्तीपासून अंतर ठेवणं हेच तुमच्यासाठी हिताचं आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

व्यसन – चाणक्य म्हणतात व्यसन हा तुमच्या यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे व्यसन, जर तुम्हाला एखाद्या वाईट गोष्टीचं व्यसन लागलं जसं की दारू, जुगार या सारख्या गोष्टींमुळे तुम्ही कंगाल व्हाल. जो व्यक्ती व्यसनाच्या आहारी जातो, असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

राग – चाणक्य म्हणतात जे व्यक्ती रागीट स्वभावाचे असतात, ते आपल्या आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत, कारण अशा लोकांपासून चांगली लोक दुरावली जातात. त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर नेहमी तुमच्या डोक्यावर बर्फ ठेवा आणि तोंडात साखर असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड