AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : प्रार्थना केल्यानं नाही तर मेहनतीमुळे मिळतं यश, यशस्वी व्हायचंय? मग या गोष्टींपासून दूरच रहा

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसाने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे? आणि काय करू नये? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहेत.

Chanakya Niti : प्रार्थना केल्यानं नाही तर मेहनतीमुळे मिळतं यश, यशस्वी व्हायचंय? मग या गोष्टींपासून दूरच रहा
Chanakya Niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 11, 2026 | 8:53 PM
Share

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य तीनी नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हायच असेल तर त्याने काय केलं पाहिजे? आणि काय करु नये? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो माणूस आळशी असतो तो आपल्या आयुष्यात काहीही करू शकत नाही. यश तर अशा लोकांसाठी फार दूरची गोष्ट असते. त्यामुळे तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी आळस झटकून टाका आणि मेहनत करा. मेहनत ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला यशाच्या द्वारापर्यंत घेऊन जाते. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर कठोर मेहनतीला पर्याय नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. पुढे चाणक्य असं देखील म्हणतात की तुम्ही जर नुसतीच मेहनत करत असाल तर त्याला देखील काही अर्थ नाही, कारण यशस्वी होण्यासाठी योग्य दिशेनं मेहनत, कष्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या कामामध्ये सातत्य हवं, तर आणि तरच तुम्ही यशस्वी व्हाल. दरम्यान अशा देखील काही गोष्टी आहेत, जर तुम्हाला यशस्वी व्हायच असेल तर या गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संगत – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाहीच. मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये आहात? जर तुम्ही वाईट लोकांच्या संगतीमध्ये असाल तर तुम्ही आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. तुमचा एखादा कितीही जवळचा मित्र असू द्या, मात्र तो जर वाईट संगतीच्या आहारी गेला असेल तर अशा व्यक्तीपासून अंतर ठेवणं हेच तुमच्यासाठी हिताचं आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

व्यसन – चाणक्य म्हणतात व्यसन हा तुमच्या यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे व्यसन, जर तुम्हाला एखाद्या वाईट गोष्टीचं व्यसन लागलं जसं की दारू, जुगार या सारख्या गोष्टींमुळे तुम्ही कंगाल व्हाल. जो व्यक्ती व्यसनाच्या आहारी जातो, असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

राग – चाणक्य म्हणतात जे व्यक्ती रागीट स्वभावाचे असतात, ते आपल्या आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत, कारण अशा लोकांपासून चांगली लोक दुरावली जातात. त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर नेहमी तुमच्या डोक्यावर बर्फ ठेवा आणि तोंडात साखर असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार....
मराठीच्या वादात राज ठाकरेंची एन्ट्री, थेट रस्त्यावर उतरणार.....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर.
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?.
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं...
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं....
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट.
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात...
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात....
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा...
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा....
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला.