AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेत 20 सामन्यांचा थरार! मुंबई इंडियन्सचे पहिल्या टप्प्यात इतके सामने

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. पहिल्या टप्प्यात 20 सामन्यांची घोषणा केली. यात मुंबई इंडियन्सचे पहिल्या टप्यात चार सामने होणार आहेत. ही स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे.

IPL 2026 स्पर्धेत 20 सामन्यांचा थरार! मुंबई इंडियन्सचे पहिल्या टप्प्यात इतके सामने
IPL 2026 स्पर्धेत 20 सामन्यांचा थरार! मुंबई इंडियन्सचे पहिल्या टप्प्यात इतके सामनेImage Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: Mar 11, 2026 | 8:34 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून ठरल्याप्रमाणे ही स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील निवडणुका जाहीर केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल. 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यानच्या 20 सामन्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तसेच नाणेफेकीचा कौल संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात मुंबई इंडियन्सचे चार सामने होणार आहे.

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत होणार आहे. हा सामना 29 मार्चला होणार आहे. या सामन्याचं ठिकाण काही ठरलेलं नाही. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. हा सामना 4 एप्रिल रोजी होईल. मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना 7 एप्रिलला संध्याकाळी 7.30 वाजत राजस्थान रॉयल्सशी होईल. तर 12 एप्रिलला रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येतील.

या स्पर्धेत एकूण 74 सामने होणार की 84 हे देखील स्पष्ट नाही. यंदा सामन्यांची वाढवणार अशी चर्चा रंगली आहे. जर 10 सामने वाढले तर प्रत्येक संघाला 16 सामने खेळावे लागू शकतात. आयपीएल मिडिया हक्क करारानुसार, बीसीसीआयने 18व्या आणि 19व्या पर्वात 84 सामने होतील असं ठरवलं होतं. पण मागच्या पर्वात 74 सामने झाले होते. त्यामुळे यंदा काय निर्णय घेतात? याकडे लक्ष असेल.

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ : रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, तिलक वर्मा, रॉबिन मिन्ज, मिचेल सैंटनर, नमन धीर, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, राजअंगद बावा, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, अल्लाह गजनफर, शार्दुल ठाकुर, शरफेन रदरफोर्ड, मयंक मार्कंडे, क्विंटन डिकॉक, दानिश मालेवर, अथर्व अंकोलेकर, मोहम्मद इजहार, मयंक रावत.

Follow Us
Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला... रामदेव बाबांचा आरोप
Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला... रामदेव बाबांच्या धक्कादायक आरोपांनी खळबळ
कॅप नं. 278 म्हणत अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला भावनिक निरोप
मोठी बातमी! कॅप नं. 278 म्हणत अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला भावनिक निरोप; व्हिडिओ शेअर करत केली घोषणा
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण..
गृहमंत्री अमित शहांनी गोळीबाराचे आदेश दिले असो की नसो दोषी तेच, कारण.... बड्या नेत्याच्या विधानानं खळबळ
तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार...
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार; थेट मंत्र्यांकडे घेतली धाव
तिला' मंत्रिमंडळात ठेवलं आहे, अन्... गिरीश महाजन आणि विजय चौधरींमधील..
तिला' मंत्रिमंडळात ठेवलं आहे, अन्... गिरीश महाजन आणि विजय चौधरींमधील कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
धनुष्यबाण कोणाच्या हाती? ठाकरे की शिंदे?; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Shiv Sena | धनुष्यबाण कोणाच्या हाती? ठाकरे की शिंदे?; शिवसेना चिन्ह वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय, त्यांनीच... दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...