Nitin Gadkari : उद्वव ठाकरेंची खुर्ची जाणार? गडकरींनी पहिल्यांदाच मौन सोडलं आणि म्हणाले, ‘हा खेळ आहे!’

राजकारण वेगळं असतं. पक्ष, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. राजकारण हे खेळासारखं आहे. सरकार बनतं तर, कधी बिघडतं. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत नेमकं काय होतं, हे पाहावं लागेल. खेळात काहीही होऊ शकतं. तसंच उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतही.

Nitin Gadkari : उद्वव ठाकरेंची खुर्ची जाणार? गडकरींनी पहिल्यांदाच मौन सोडलं आणि म्हणाले, 'हा खेळ आहे!'
नितीन गडकरी, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 10:30 AM

नागपूर : मुंबई आणि गुवाहाटी येथून सत्तेसाठी पेचप्रसंग (Power Struggle) सुरू आहे. हा एकप्रकारे मुंबई-गुवाहाटी असा जाम आहे. हा कसा खुलेल, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना झी न्यूजच्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावेळी गडकरी म्हणाले, निसर्ग ( Nature) नियमानुसार, सर्व जागेवर जाम लागतो. त्यासाठी पारदर्शकता आणावी लागेल. स्वच्छता करावी लागेल. लवकरच हा जाम निघून जाईल, असं मला वाटतं. उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार का, यावर गडकरी म्हणाले, काय होत ते बघुया. हळूहळू सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. परिस्थिती सुरळीत होईल. उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली संकटाची परिस्थिती निघून जातील. अंधार निघून जाईल. सूर्य निघेल. सर्वकाही प्रकाशासारखं स्वच्छ होईल. राजकारण (Politics) हा एक खेळ आहे. खेळात काहीही होऊ शकतं, असंही ते म्हणाले.

राजकारण एक खेळ

नितीन गडकरी म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत संबंध चांगले आहेत. पण, राजकारण आणि वैयक्तिक संबंध यात फरक असतो. वैयक्तिक संबंध हे राजकारणाहून वेगळे असतात. मग, ते सरकारमध्ये असोत की नसोत. संबंध तेच राहतात. राजकारण वेगळं असतं. पक्ष, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. राजकारण हे खेळासारखं आहे. सरकार बनतं तर, कधी बिघडतं. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत नेमकं काय होतं, हे पाहावं लागेल. खेळात काहीही होऊ शकतं. तसंच उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतही.

चालत राहणं हा निसर्गाचा नियम

माजी पंतप्रधान अटल बिहारी म्हणायचे, सरकार बनतात, बिघडतात. लोक येतात. जातात. पंतप्रधान येतात. बदलतात. पण, देश हाच राहतो. आपल्याला देशासाठी काम करायचं आहे. गाव, गरीब मजूर, शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. आत्मनिर्भर देश तयार करायचं आहे. देशाला आर्थिक महासत्ता बनवायचं आहे. देशासाठी काम करायचं हीच आमची भावना आहे. कधी उन्ह असतं, कधी सावली असते. कधी चांगला रस्ता राहतो. कधी जाम होतो. चालत राहणे हाच निसर्गाचा नियम आहे. त्यासोबतच चालत राहावं लागेल. सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं उत्तर नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरेंच्या सत्तासंघर्षाबद्दल दिलं.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.