Astro Tips : कर्जातून होईल मुक्तता, थांबलेला पैसाही मिळेल परत, हे ज्योतिषीय उपाय आहेत फारच प्रभावी
आर्थिक अडचण निर्माण होण्यासाठी काही वेळा राशिचक्र किंवा पत्रिकेतील दोषही जबाबदार असतात. नियतीच्या उपरोधामुळे कर्ज वाढतच जाते. व्यक्तीच्या या समस्येवर उपाय ज्योतिष शास्त्रात (Astro Tips) सांगितला आहे.

ज्योतिषीय उपाय
Image Credit source: Social Media
मुंबई : आर्थिक अडचणींमुळे बऱ्याचदा कर्ज घेण्याची पाळी येते. कर्ज घेताना बऱ्याचदा पुढचा म्हणजेच ते फेजणार कसे याचा विचार अनेक जण करत नाही. परिणामी या कर्जातून मुक्त होण्याऐवजी त्याचे ओझे बनते. उत्पन्न वाढले तरी कर्ज कमी होत नाही. आर्थिक अडचण निर्माण होण्यासाठी काही वेळा राशिचक्र किंवा पत्रिकेतील दोषही जबाबदार असतात. नियतीच्या उपरोधामुळे कर्ज वाढतच जाते. व्यक्तीच्या या समस्येवर उपाय ज्योतिष शास्त्रात (Astro Tips) सांगितला आहे. ज्याचे पालन केल्याने धन आणि यश प्राप्त होते. तसेच आपण कर्जमुक्त होऊ शकते. जाणून घेऊया हे प्रभावी उपाय कोणते आहेत.
आर्थिक संकट दूर करण्याचे आणि कर्जातून मुक्त होण्याचे सोपे मार्ग
- सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम तुमचा उजवा पाय जमिनीवर ठेवावा. दोन्ही तळहाताचे दर्शन घ्यावे. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती। करमूले तू गोविंदम् प्रभाते कर दर्शनम्।। हा मंत्र हाताकडे पाहून म्हणावा. पुजेच्या वेळी थोडे दूध पाण्यात मिसळून श्रीकृष्णाला अर्पण करावे. पूजागृह ईशान्य, उत्तर किंवा पूर्व दिशेलाच बांधावे. देवघराच्या अग्नि कोपऱ्यात धूप दिवा लावावा. जर देवघर लाकडाचे असेल तर ते भिंतीला लागून ठेवू नये. घरात तुटलेली खाट, तुटलेली भांडी नसावीत. तुटलेल्या भांड्यांमध्ये अन्न शिजवू नये. त्यामुळे कर्ज वाढते. तुमच्या मुख्य दरवाजासमोर किंवा इमारतीसमोर पिंपळाचे झाड, टेलिफोन, विजेचा खांब असल्यास किंवा त्याची सावली पडत असल्यास ते ताबडतोब काढून टाका. अशा गोष्टींमुळे घरात लक्ष्मी टिकत नाहीत.
- तुमच्या घराची दक्षिण भिंत उत्तरेकडील भिंतीपेक्षा उंच असावी. असे नसल्यास तुमच्या घरी पैसे नक्कीच येतील, पण ते वाचणार नाहीत. यासोबतच कर्जही फेडले जाणार नाही. उत्तर दिशेला उंच भिंत असेल तर ती लहान करा. दक्षिणेला उंच भिंत बनवावी. उत्तर आणि पूर्व दिशेला जितका उतार असेल तितकी तुमच्या मालमत्तेत वाढ होईल. दुसरीकडे, जर तुम्ही कर्जामुळे जास्त त्रासलेले असाल, तर उत्तर-पूर्व दिशेला उतार करा, तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल.
- जर तुमच्या घराच्या दक्षिण-पश्चिम किंवा दक्षिण दिशेला भूमिगत टाकी, विहीर किंवा नळ असेल तर धनहानी होते. जर तुमच्या घरात असे असेल तर ते ताबडतोब काढून टाका आणि ईशान्येला भूमिगत टाकी बनवा. भूमिगत टाकी किमान 2 ते 3 फूट खोल असावी. जर तुम्ही प्लॉट खरेदी करत असाल तर लक्षात ठेवा की दोन इमारतींनी वेढलेल्या इमारतीत प्लॉट खरेदी करू नका.
- पूर्व आणि उत्तर दिशा नेहमी हलकी असावी. घराचा मध्य भाग पूर्णपणे रिकामा असावा. त्यात जड वस्तू असू नयेत. तसेच येथे भूमिगत टाक्या वगैरे बनवू नका. असे झाले तर कर्जमुक्ती कधीच मिळणार नाही. केंद्र पूर्णपणे स्वच्छ ठेवावे. अंगणात तुळशीचे रोप लावावे. घराच्या उत्तर आणि दक्षिण भिंती पूर्णपणे सरळ असाव्यात. एकही कोपरा तुटलेला नसावा. जर आरसा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असेल तर ही स्थिती कर्जाचे सूचक आहे. त्यामुळे आरसा उत्तर किंवा पूर्व भिंतीवर किंवा उत्तर-पूर्व दिशेला भिंतीवर लावावा.
- आरसा स्वच्छ आणि मोठा असावा. हे यामुळे सकारात्मकता येते. कर्ज संपते आणि व्यवसाय वाढतो. घराचे दरवाजे ईशान्य दिशेला असल्याने मानसिक शांती आणि व्यवसाय वाढतो. घराच्या पायऱ्या कधीही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लागून ठेवू नका. पायऱ्या दक्षिण आणि पश्चिम दिशेला कराव्यात. जिन्याची पहिली पायरी मुख्य दरवाजातून दिसू नये. यामुळे धनहानी होते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us