Astrology: म्हणून शनिवारी शनि मंदिरातून चपला जोडे चोरी जाणे असते शुभ; अनेकाकांना नाही माहिती कारण

| Updated on: Jul 11, 2022 | 6:05 PM

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि ग्रह (Shani Planet) अशुभ स्थितीत असेल तर कामात यश सहजासहजी मिळत नाही. होणारे कामसुद्धा बिघडत जाते . जुन्या लोकांकडून आपण ऐकले असेल की शनी मंदिरातून चपला चोरी जाणे शुभ (shoes stolen from shani mandir)  असते. आपण ज्या चपला घालतो त्यामध्ये आपल्या ऊर्जेचे वास्तव्य असते. मग ती ऊर्जा सकारात्मक असो वा नकारात्मक […]

Astrology: म्हणून शनिवारी शनि मंदिरातून चपला जोडे चोरी जाणे असते शुभ; अनेकाकांना नाही माहिती कारण
Follow us on

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि ग्रह (Shani Planet) अशुभ स्थितीत असेल तर कामात यश सहजासहजी मिळत नाही. होणारे कामसुद्धा बिघडत जाते . जुन्या लोकांकडून आपण ऐकले असेल की शनी मंदिरातून चपला चोरी जाणे शुभ (shoes stolen from shani mandir)  असते. आपण ज्या चपला घालतो त्यामध्ये आपल्या ऊर्जेचे वास्तव्य असते. मग ती ऊर्जा सकारात्मक असो वा नकारात्मक त्या ऊर्जेचा प्रभाव ती धारण करणाऱ्यावर होतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीत संतांच्या पादुकांना विशेष महत्त्व आहे. जोतिष्यशास्त्रात (Astrology) शनी हा न्यायदेवता म्हणून ओळखला जातो.  शनी मंदिरातून चपला चोरी जाणे शुभ का मानतात या मागे कशी करणं आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.

चामडे आणि पाय या दोन्हींवर शनीचा प्रभाव पडतो

भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये असे मानले जाते की चामडे आणि पाय या दोन्हींवर शनीचा प्रभाव पडतो, त्यामुळे शनिवारी जोडे आणि चप्पल चोरीला गेल्यास त्रासदायक दिवस लवकरच दूर होणार आहेत असे मानले जाते. शनिदेवाचे दुःख कमी व्हावे म्हणून अनेक लोक शनिवारी शनी मंदिरात बूट आणि चप्पल टाकून जातात. किंबहुना, मंदिरातून चपला आणि जोडे चोरीला जाणे शुभ संकेत आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रात याबाबत अनेक प्रकारच्या समजुती आहेत. शनिवारी मंदिरातून बूट आणि चप्पल चोरीला गेल्यास ते खूप शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार हे शुभ संकेत आहे. जर शनिवारी मंदिरातून बूट आणि चप्पल हरवली किंवा चोरीला गेली तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमचा वाईट काळ संपणार आहे, आणि आर्थिक संकटसुद्धा लवकरच संपणार आहे.

शनिवारी जोडे आणि चप्पल चोरीला जाणे  शुभ असते

ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की, शनि चरणात वास करतो. पायाशी शनि ग्रहाचा संबंध असल्याने शनी चप्पल आणि जोडे यांचा कारक आहे. यासोबतच असे मानले जाते की शनिवारी जोडे आणि चप्पल दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि सर्व संकटे दूर होतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)