मुंबई : आजकाल सोन्यापेक्षा अधिक हिरे घालण्याचा ट्रेंड आहे. हिरा हे तुमचे स्टेटस सिम्बॉल आहे आणि त्याचे दागिने अतिशय आकर्षक दिसतात. ज्योतिष शास्त्रानुसार, हिरा हे शुक्र ग्रहाचे रत्न आहे. शुक्र ग्रह सशक्त असल्याने त्या व्यक्तीचे जीवन विलासी असते. पण ज्योतिषी मानतात की प्रत्येकाने हिरा परिधान करु नये, कारण तो प्रत्येक व्यक्तीसाठी शुभ नाही. जर तुम्ही कोणताही सल्ला न घेता हिरा घातला तर तुम्हाला त्याचे अशुभ परिणाम मिळू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, या 5 राशींनी ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय या परिस्थितीत हिरे घालू नयेत.
जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि तुमचा शुक्र दुसऱ्या किंवा सातव्या घराचा स्वामी असेल तर तुम्ही हिरा घालू नये. अशा परिस्थितीत हे रत्न तुमच्यासाठी खूप समस्या निर्माण करू शकते.
कर्क राशीच्या लोकांनी सर्वसाधारणपणे हिरा घालू नये. परंतु जर तुमच्यावर शुक्राची महादशा चालत असेल तर हिरा तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. म्हणून, एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानंतरच तो घाला.
या राशीच्या लोकांसाठी शुक्र शुभ मानला जात नाही, म्हणून त्यांनी हिरे घालू नयेत. त्यांनी सल्लामसलत केल्याशिवाय कधीही हिरा घालू नये, अन्यथा अशुभ परिणाम प्राप्त होतात.
या राशीच्या स्वामीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ आणि शुक्र यांच्यामध्ये वैर आहे. म्हणून, या लोकांसाठी हिरा अशुभ परिणाम देतो. जर त्यांनी हा हिरा घातला तर त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात.
जर या राशीच्या लोकांनी हिरा घातला असेल तर त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या समोर येतात. म्हणूनच त्यांनी हिरे घालू नयेत.
मीन राशीतील तिसऱ्या आणि आठव्या घराचा स्वामी शुक्र आहे. या व्यतिरिक्त, मीन राशीचा स्वामी गुरु आहे जो देव गुरु आहे, तर शुक्र हा राक्षस गुरु आहे. त्यांच्यात वैर आहे. त्यामुळे जर मीन राशीच्या लोकांनी हिरा घातला तर अशुभ परिणाम मिळतो आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
Zodiac Signs | या राशींच्या व्यक्ती जन्मापासूनच असतात नियोजनात वाकबगार, व्यवस्थापन क्षेत्रात मोठं यश मिळवतातhttps://t.co/10uJFOzTRW#Zodiacs #ZodiacSigns #management
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 19, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Monsoon | ‘या’ चार राशींच्या व्यक्तींना आवडतो हा ऋतू, मनसोक्त आनंद लुटतात