
मुंबई : एखाद्या व्यक्तीसाठी, त्याचे घर सर्वात निवांत असे ठिकाण आहे. माणूस सुखाने जगता यावे म्हणून घरात सर्व व्यवस्था करतो, पण कधी कधी आयुष्यात काही नकारात्मक घटना त्या व्यक्तीला निराश करतात आणि घरातील वास्तुदोषांमुळे व्यक्तीला एकटेपणा जाणवू लागतो आणि नकारात्मक भावना निर्माण होते. अशा परिस्थितीत तुम्ही हे वास्तु उपाय (Vastu Tips) करून पाहू शकता.
जर एखाद्या व्यक्तीला घरातल्यापेक्षा घराबाहेर राहणे आवडत असेल तर समजून जा की घरात नक्कीच काहीतरी चुकीचे आहे. वास्तविक असे घडते कारण घराच्या बांधकामात वास्तूची तत्त्वे पाळली गेलेली नसतात. वास्तु नियमांच्या अज्ञानामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. अशा घरांमध्ये सकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
घरामध्ये काही मूलभूत वास्तु नियमांचे पालन करून घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित केली जाऊ शकते. ताबडतोब वास्तू तज्ञाचा सल्ला घ्या आणि दोष शोधून काढा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)