Chanakya Niti : असे लोक म्हातारपणात आनंदी जीवन जगतात, चाणक्य यांनी काय सांगितलंय?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांच्या मते जे लोक तरुणपणात पैशांचं योग्य नियोजन करतात असे लोक म्हातारपणात आनंदी आयुष्य जगतात, ते कोणावरही अवलंबून नसतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : असे लोक म्हातारपणात आनंदी जीवन जगतात, चाणक्य यांनी काय सांगितलंय?
chanakya niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 28, 2026 | 10:03 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ होते. त्यामुळे माणसानं आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? पैसे कुठे खर्च करावेत? आणि कुठे पैशांची बचत करावी? याबद्दल अनेक गोष्टी त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात आयुष्यात पैसा सर्वात महत्त्वाचा आहे. जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही कोणत्याही संकटामधून सहज बाहेर पडू शकतात. त्यामुळे व्यक्तीने आपल्या आयुष्यात पैशांची बचत केलीच पाहिजे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य म्हणतात तुम्ही जर दर महिन्याला 100 रुपये कमवत असाल तर त्यातील 25 रुपयांची बचत केलीच पाहिजे. हीच पैशांची बचत तुमच्या वृद्धापकाळातील जमापुंजी असते, जे व्यक्ती तरुणपणात वृद्धापकाळासाठी पैशांची बचत करतात, असे लोक आपलं उर्वरीत जीवन आरामात जगू शकतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आरोग्य – चाणक्य म्हणतात आरोग्य हा माणसाचा सर्वात मौल्यवान दागिना आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं आरोग्य जपलंच पाहिजे. तरुणपणात तुम्ही जर तुमच्या आरोग्याची काळजी घेतली तर म्हातारपणात तुमची तब्येत ठणठणीत राहील, जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर म्हातारपणात तुम्ही जगण्याचा आनंद घेऊ शकतात.

पैसा – चाणक्य म्हणतात तरुण असताना जो व्यक्ती आपल्या वृद्धापकाळासाठी पैशांची बचत करतो, ज्याच्या हाताशी पैसा आहे, असा व्यक्ती म्हातारपणात आनंदी जीवन जगतो, तो पैशांसाठी इतर कोणावरही अवलंबून नसतो. तसेच हातात पैसा असल्यामुळे त्याला समाजात आदराचं स्थान असतं.

चांगली मुलं – ज्या व्यक्तीची मुलं ही चांगली असतात, म्हातारपणात त्या व्यक्तीचा सांभाळ करतात, त्या व्यक्तीचं म्हातारपण हे आनंदात जातं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us