AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पुढील दीड महिन्यात राज्यात मोठे फेरबदल? फडणवीस, शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या

सध्या राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याचं पहायला मिळत आहे.

मोठी बातमी! पुढील दीड महिन्यात राज्यात मोठे फेरबदल? फडणवीस, शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या
राज्यात फेरबदलाचे संकेत Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 16, 2026 | 6:51 PM
Share

पुढील दीड महिन्यामध्ये राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार आहेत, त्याचा मोठा परिणाम हा राज्याच्या राजाकारणावर होणार असल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांकडून मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याचं देखील पहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यामुळे राज्यात आणि केंद्रात मोठे फेरबदल होणार असल्याच्या या वृत्ताला बळ मिळत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याने केंद्रात आणि राज्यात पुढील दीड महिन्यांमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती दिल्लीतील सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. वीस जुलैपासून दिल्लीमध्ये संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनानंतर केंद्रातील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. केंद्रात होणाऱ्या या बदलाचा परिणाम हा महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत दिल्लीमध्ये असण्यामागे हेच फेरबद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याच्या चर्चेनं राज्याच्या राजकारणात जोर धरला आहे. मात्र फडणवीसांकडून अद्याप त्याबाबत कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीयेत.

तुम्ही दिल्लीला जाणार का असा प्रश्न फडणवीसांना पत्रकारांनी  विचारला असता, त्यांनी या प्रश्नाला मिश्किल उत्तर दिलं, मी कालच दिल्लीला जावून आलो असं त्यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान दुसरीकडे असाच प्रश्न एकनाथ शिंदे यांना देखील विचारण्यात आला, तुम्ही मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी देखील मिश्किल उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्रिपदाची व्हॅकन्सी आहे का सध्या? असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळ अजून तरी तसेच स्पष्ट संकेत दोघांकडूनही मिळालेले नाहीयेत. मात्र राज्यात गेल्या काही महिन्यांपासून ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यावरून असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता नेमकं काय घडणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक