AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : विषासमान असतात या 4 चुका, माणसाला हळुहळु मरणाकडे ढकलतात, चाणक्यांनी काय सांगितलं आहे?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की माणसाच्या काही सवयी अशा असतात ज्याची तुलना केवळ विषासोबतच होऊ शकते. या सवयी माणसाला हळुहळु मृत्यूकडे ढकलतात, त्यामुळे या सवयींचा त्याग करण्यातच तुमचं हीत आहे.

Chanakya Niti : विषासमान असतात या 4 चुका, माणसाला हळुहळु मरणाकडे ढकलतात, चाणक्यांनी काय सांगितलं आहे?
chanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 08, 2026 | 9:30 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की माणसाच्या अंगी अशा काही सवयी असतात ज्यांची तुलना केवळ विषासोबतच होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीने विष प्राशन केलं तर त्याचा लगेचच मृत्यू होतो. परंतु माणसाच्या या सवयी हळुहळु परिणाम करणाऱ्या विषासमान आहेत. जर तुम्हाला या सवयी असतील तर तुमचा लगेचच मृत्यू होत नाही. मात्र या सवयी हळुहळु तुम्हाला मरणाच्या दाराकडे ढकलतात. या सवयींमुळे तुमचं भविष्यात फार मोठं नुकासन होतं. मात्र नुकसान होईपर्यंत तुमच्या ते लक्षात देखील येत नाही. मात्र जेव्हा तुम्ही सर्व काही गमावून बसतात, तेव्हा तुम्हाला पश्चताप होतो. त्यामुळे तुम्हाला देखील या सवयी असतील तर या गोष्टींपासून तुम्ही आजच दूर झालं पाहिजे, अन्यथा भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होईल, असा इशारा चाणक्य यांनी दिला आहे, चला तर मग जाणुन घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आळस – चाणक्य म्हणतात आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. दुसऱ्या कोणत्याच सवयीमुळे तुमचं जेवढं नुकसान होत नाही, तेवढं नुकसान आळसामुळे होतं. जेव्हा तुमच्या अंगात आळस असतो, तेव्हा तुम्ही काम टाळतात. आज महत्त्वाचं असलेलं काम तुम्ही उद्यावर ढकलतात. त्यामुळे तुमचं भविष्यात फार मोठं नुकसान होतं. लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं, त्यामुळे मानसाने आपल्या कामात कधीही आळस करू नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

काम टाळण्याची सवय – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाला पर्याय नाही, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवायचं असेल तर तुम्हाला कष्ट करावेच लागणार आहे. जर तुम्ही काम टाळत असाल तर ही सवय तुम्हाला घातक ठरू शकते. त्यामुळ कधीही आपली जबाबदारी टाळू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

रागाच्या भरात निर्णय – चाणक्य म्हणतात अनेक लोकांना अशी सवय असते की ते रागाच्या भरात लगेच तडका फडकी निर्णय घेऊन टाकतात. मात्र अशा गोष्टींमुळे भविष्यात हे लोक अडचणीत येतात. त्यामुळे कोणताही निर्णय हा कधीही रागाच्या भरात घेऊ नका. आधी त्यावर शांत डोक्याने विचार करा आणि मगच निर्णय घ्या.

कर्ज – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीला कर्ज घेण्याची सवय असते, असा व्यक्ती मोठ्या संकटात सापडू शकतो. कर्ज घेताना आपल्याला कर्ज कोणत्या कामासाठी लागत आहे? आणि आपण ते कर्ज फेडू शकतो का? याचा विचार करूनच कर्ज घ्या असं चाणक्य म्हणतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.