Chanakya Niti : त्या महिलांपासून सावधान, शरीरयष्टीने ओळखा स्वभाव…

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांची धोरणे केवळ भारतातच नव्हे तर जगभर पाळली जातात. चाणक्य यांच्या सांगण्यानुसार, माणसाने कधीही आपल्या मनातील गुपिते उघड करू नयेत.

Chanakya Niti : त्या महिलांपासून सावधान, शरीरयष्टीने ओळखा स्वभाव...
| Updated on: Jul 11, 2024 | 4:03 PM

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यातील काही अत्यंत महत्वाच्या आणि फायद्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य हे भारतातील प्रमुख अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. महान रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ, अशी देखील त्यांची ओळख आहे. चाणक्य नीतीमध्ये आचार्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर आपल्याला आयुष्यात प्रगती करायची असेल तर आपण नेमक्या कोणत्या लोकांपासून चार हात दूर रहायला हवं, याबद्दल आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांनी (चाणक्य नीती) अशा गोष्टी लिहिल्या आहेत ज्याचे संपूर्ण जग अनुसरण करते. चाणक्य नीतिचा अवलंब करून त्यांनी जगभर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आचार्य चाणक्य (चाणक्य नीती) यांनी लिहिलेली ही धोरणे तेव्हा जितकी महत्वाची होती, आजही तितकीच प्रासंगिक आहेत. आचार्य चाणक्या यांनी लिहिलेल्या गोष्टींचे पालन केल्याने माणसाला जीवनाला योग्य दिशा मिळते.

आचार्य चाणक्य यांनी अत्यंत फायद्याच्या आणि महत्वाच्या गोष्टी चाणक्य नितीमध्ये सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपण जर फॉलो केल्यातर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या या कायमच्या दूर होण्यास मदत होते. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीती या पुस्तकात चारित्र्यहीन स्त्रियांबद्दल बरेच काही सांगितले आहे.  तुम्हीही त्याबद्दल जाणून घेऊ शकता.

अशा महिलांपासून रहा दूर

चाणक्य नीती मध्ये स्त्रियांबद्दल बरेच काही लिहिले आहे. त्यापैकी एक म्हणजे पुरुषाने कोणत्या स्त्रियांपासून दूर राहावे हे देखील त्यात नमूद करण्यात आले आहे.

लहान मान असलेल्या महिलांपासून नेहमी दूर राहावे, कारण चाणक्य नीतीनुसार, लहान मान असलेल्या महिला नेहमी इतरांच्या निर्णयावर अवलंबून असतात.

चाणक्य नीतमध्ये असे सांगण्यात आले आहे की सपाट मानेच्या स्त्रियांचा स्वभाव खूप रागीट आणि क्रूर असतो. याशिवाय या महिलांच्या गालावर डिंपल असतील तर त्यांचे चारित्र्य चांगले नसते. याशिवाय ज्या महिलांचे डोळे पिवळे आणि भीतीदायक दिसतात त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)