AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी विभाग विभागाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन, पेरणीकरिता घाई नको, देवेंद्र फडणवीस यांनीही..

राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. मॉन्सूनचा पाऊस दाखल झाला नाही. यादरम्यानच कृषी विभाग आणि देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठे आवाहन केले. पेरण्याबाबत हे आवाहन करण्यात आले. 20 जूनला मॉन्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

कृषी विभाग विभागाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन, पेरणीकरिता घाई नको, देवेंद्र फडणवीस यांनीही..
Agriculture Department
| Updated on: Jun 15, 2026 | 8:45 AM
Share

भारतीय हवामान विभागाने राज्यात 15 जून 2026 रोजी मॉन्सूनचा पाऊस येण्याचा अंदाज दिला होता. मात्र, मॉन्सून अजून अरबी समुद्रातच आहे. मॉन्सून अरबी समुद्रातून पुढे वाटचाल करताना दिसत नाही. एकाच ठिकाणी आहे. अफगाणिस्तानच्या दिशेने आलेल्या वाऱ्याने मॉन्सूनला अडथळा निर्माण झाला. आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यात 20 जूनपर्यंत मॉन्सून दाखल होईल. या अंदाजानुसार, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांनी शेत पेरणीसाठी तयार ठेवले. नांगरनी झाली, घरात बिय बियाने, खते आणून टाकली आहेत. मात्र, वरूण राजा काही बरसताना दिसत नाहीये. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. यंदा पाऊस कमी पडण्याचा इशारा देण्यात आला. त्यात एल निनोचे वेगळे संकट उभे आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय आहे. फक्त राज्यातीलच नाही तर देशातील मॉन्सून आजच्या घडीला धोक्यात आहे. 20 जूनच्या पावसाकडून सर्वांना अपेक्षा आहेत.

मॉन्सूनचा पाऊस 20 जूनला राज्यात दाखल होईल. त्यानंतर कृषी विभाग शेतकऱ्यांना पेरण्याबद्दल आवाहन करेल. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मोठा इशारा देत स्पष्ट सांगितले आहे की, जोपर्यंत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून आवाहन केले जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत. जर आता पेरण्या केल्या तर दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते.

मॉन्सूनचा पाऊस जरी 20 जूनला दाखल होण्याचा अंदाज असला तरीही अजूनही तो अंदाजच आहे. अगोदर 15 जूनला मॉन्सून दाखल होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, मॉन्सून पुढे गेला. यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना मोठे आवाहन करत म्हटले की, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. ज्यावेळी सांगितले जाईल, त्यावेळी पेरण्या कराव्यात.

अरबी समुद्रात मॉन्सून दाखल झाला. मात्र, तो एकाच ठिकाणी रेंगाळला आहे. पुढील 3-4 दिवसात मॉन्सून पुढे वाटचाल करण्याची शक्यता आहे. पण जोपर्यंत मॉन्सून पूर्णपणे मुंबईसह राज्यात दाखल होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत. पेरण्या रखडल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले