
शास्त्रात सांगितले आहे की जर तुमच्या जेवणात केस दिसलं तर ते अन्नातून लगेच काढून टाकावे. असे अन्न तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकतं. बऱ्याच वेळा, ज्या गोष्टींना आपण योगायोग मानून दुर्लक्ष करतो, त्या गोष्टींचा प्रत्यक्षात काही अर्थ असतो आणि त्या एखाद्या गोष्टीचे संकेत असतात.

जेव्हा आपल्याला अन्नामध्ये केस आढळतात तेव्हा आपल्याला असं वाटते की केस स्वयंपाक करताना चुकून पडले असावेत आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण ही गोष्ट दुर्लक्षित करण्यासारखी नाही. कोणत्याही कारणाशिवाय तुमच्या जेवणात वारंवार सापडत असतील तर ज्योतिषशास्त्रानुसार ते शुभ मानलं जात नाही.

शास्त्रात असं म्हटलं आहे की, जर तुम्ही जेवायला सुरुवात केल्यानंतर लगेच किंवा अर्ध जेवण झाल्यानंतर केस सापडत असतील तर ते पितृदोषाचं प्रमुख कारण असू शकतं.

ज्योतिषशास्त्रात हे पितरांच्या नाराजीचे लक्षण मानलं जातं. हे पुन्हा पुन्हा तेव्हाच घडते जेव्हा तुमचा एखादा पूर्वज रागावतो आणि तुम्ही त्यांच्या शांतीसाठी काही उपाय करत नाही.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)