AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gangasnan : फक्त धार्मिकच नाही तर शास्त्रीय कारणांसाठीही केले जाते गंगास्नान, अशा प्रकारे झाली गंगेची उत्पत्ती

गंगाजलावर आतापर्यंत अनेक संशोधने झाली आहेत. त्यापैकी एक संशोधन लखनौच्या नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने देखील केले होते, ज्यामध्ये त्यांना आढळले की गंगेच्या पाण्यात..

Gangasnan : फक्त धार्मिकच नाही तर शास्त्रीय कारणांसाठीही केले जाते गंगास्नान, अशा प्रकारे झाली गंगेची उत्पत्ती
गंगास्नानImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 11, 2023 | 12:03 PM
Share

मुंबई : भगवान शिवाच्या जटांमधून बाहेर पडणारी गंगा हिमालयाचे मोठे हिमनग पार करून तराई प्रदेशात प्रवेश करते तेव्हा तिचे धार्मिक महत्त्व अधिकच वाढते. म्हणूनच विविध धार्मिक विधींमध्ये गंगाजल निश्चितपणे वापरले जाते. असे मानले जाते की जे गंगेत स्नान (Gangasnan Importance) करतात त्यांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. पण गंगेत स्नान करण्याचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे हे तुम्हाला माहिती आहे का? अनेक संशोधकांनीही याला दुजोरा दिला आहे. चला जाणून घेऊया, गंगेत स्नान करण्याचे आध्यात्मिक, वैज्ञानिक महत्त्व काय आहे आणि गंगा मातेच्या जन्माची पौराणिक कथा काय आहे?

गंगाजलाशी संबंधित वैज्ञानिक तथ्ये

गंगाजलावर आतापर्यंत अनेक संशोधने झाली आहेत. त्यापैकी एक संशोधन लखनौच्या नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने देखील केले होते, ज्यामध्ये त्यांना आढळले की गंगेच्या पाण्यात रोग निर्माण करणाऱ्या ई. कोलाय बॅक्टेरिया मारण्याची क्षमता आहे. शास्त्रज्ञांचा असाही विश्वास आहे की गंगा हिमालयातून वाहते तेव्हा अनेक खनिजे आणि वनौषधींचा त्यावर परिणाम होत राहतो आणि त्यातून औषधी गुणधर्म प्राप्त होतात.

गंगाजलाशी संबंधित वैज्ञानिक तथ्ये

गंगाजलामध्ये ऑक्सिजन शोषण्याची अद्भुत क्षमता असल्याचे संशोधकांना तपासात आढळून आले आहे. म्हणूनच गंगेच्या पाण्यात सल्फर मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे पाणी जास्त काळ खराब होत नाही. शास्त्रज्ञांनी गंगास्नान आणि गंगाजल पिण्यामागे अनेक प्रशिक्षणे देखील केली आहेत, ज्यामध्ये त्यांना आढळले की गंगाजल पिण्याने कॉलरा, प्लेग किंवा मलेरिया यांसारख्या रोगांचे धोकादायक जंतू नष्ट होतात.

गंगा स्नानाचे धार्मिक महत्त्व

गंगा माता मोक्षदायिनी म्हणून ओळखली जाते. कारण प्राचीन काळापासून असे मानले जाते की गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुऊन जातात आणि अनंत पुण्य प्राप्त होते. अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने साधकाला देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यासोबतच गंगेच्या तीरावर श्राद्ध किंवा तर्पण वगैरे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

माता गंगेच्या जन्माची कथा

धार्मिक मान्यतेनुसार, माता गंगेचा जन्म वैशाख शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला झाला होता. माता गंगेच्या जन्मासंबंधी अनेक कथा वेद आणि पुराणात प्रचलित आहेत. वामन पुराणानुसार भगवान विष्णूने वामनाचे रूप धारण केले तेव्हा त्यांनी एक पाय आकाशाकडे उचलला. तेव्हा ब्रह्माजींनी भगवान विष्णूचे पाय धुतले आणि एका कमंडलात पाणी भरले. या पाण्याच्या तेजातून गंगेचा जन्म झाला. यानंतर ब्रह्माजींनी गंगा पर्वतराज हिमालयाच्या स्वाधीन केली आणि अशा प्रकारे देवी पार्वती आणि माता गंगा बहिणी झाल्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ