Indian Traditions | भारतीय परंपरेतील विज्ञानाशी सांगड घालणाऱ्या जुन्या पारंपारिक गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?

| Updated on: Feb 07, 2022 | 12:03 PM

भारत (India) हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. म्हणूनच प्रत्येक संस्कृतीला रूढी आणि परंपरा (Tradition)असतात. परंतु यापैकी काही जुन्या परंपरांमध्ये त्यांच्याशी संबंधित अनेक आरोग्य फायदे देखील आहेत.

Indian Traditions | भारतीय परंपरेतील विज्ञानाशी सांगड घालणाऱ्या जुन्या पारंपारिक गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?
Indian-Traditions
Follow us on

मुंबई : भारत (India) हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. म्हणूनच प्रत्येक संस्कृतीला रूढी आणि परंपरा (Tradition)असतात. परंतु यापैकी काही जुन्या परंपरांमध्ये त्यांच्याशी संबंधित अनेक आरोग्य (Benefits) फायदे देखील आहेत. भारतीय परंपरातील अनेक गोष्टींचा सांगड विज्ञानासोबत केली आहे. यामध्ये नमस्ते करणे, ध्यान, हळदीने स्वयंपाक करणे, तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे आणि हाताने खाणे इत्यादींचा समावेश आहे. चला तर मग आज भारतातील या जुन्या परंपरांमागे लपलेले आरोग्यवर्धक फायदे जाणून घेऊयात.

नमस्काराचे महत्त्व
नमस्ते हा नम्रता आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हावभाव आहे. अभिवादन करण्यासाठी भारतात याचा वापर केला जातो. जेव्हा आपण नमस्तेमध्ये हाताचे तळवे जोडतो तेव्हा त्याला अंजली मुद्रा म्हणतात. अंजली मुद्राचा नियमित सराव केल्याने एकाग्रता वाढते, मन शांत होते आणि तणाव दूर होण्यास मदत होते.

मंदिरातील घंटा
परंपरेने मंदिरातील घंटा वाजवून पूजा सुरू होते. बेलचा शांत आवाज व्यक्तीला लक्ष केंद्रित करण्यास आणि स्वतःशी जोडण्यास मदत करतो. बेलचा आनंददायक आवाज मेंदूच्या डाव्या आणि उजव्या बाजूला एकसंधता निर्माण करतो. हा आवाज मानवी शरीरातील सात चक्रांना सक्रिय करतो.

ध्यानाचे महत्त्व
साधकाचा आत्मा आणि परमात्मा यांच्यात ऐक्य साधणे हा ध्यानाचा उद्देश आहे. ध्यान केल्याने तुमचे शरीर, मन आणि इंद्रिये शांत होतात. ध्यान केल्याने एकाग्रतेची पातळी वाढते. तुमच्या भावनिक आरोग्याची काळजी घेण्याव्यतिरिक्त, डोकेदुखी, निद्रानाश, सांधे आणि स्नायूंच्या समस्या कमी करण्यास मदत करते.

हाताने अन्न जेवणे
बोटांच्या मज्जातंतूचे टोक पचनास प्रोत्साहन देतात. आयुर्वेदानुसार आपली पाच बोटे पाच तत्वांसारखी आहेत. त्यात जमीन, जल, अग्नि, आकाश आणि वायू इत्यादींचा समावेश होतो. यामुळे शरीरातील पाच तत्वे जागृत होतात. याने केवळ भूकच नाही तर मनही तृप्त होते. वेदांनुसार, हाताने अन्न खाताना स्पर्श केल्याने चक्रांना चालना मिळते आणि अनेक फायदे होतात.

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे
तांबे हे मानवी आरोग्यासाठी आवश्यक खनिज आहे. तांबे पाण्यात असलेली बुरशी आणि बॅक्टेरिया यांसारखे सूक्ष्मजीव नष्ट करू शकते. तांब्याच्या भांड्यातील पाणी देखील शरीराचे पीएच संतुलन राखण्यास मदत करते. तांबे अशक्तपणा, कमी कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळी रोखण्यासाठी ओळखले जाते.

हळद सह स्वयंपाक
हळद हा भारतात पिढ्यानपिढ्या वापरला जाणारा मसाला आहे. याचा उपयोग अनेक गोष्टींसाठी होतो. हे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर अनेक धार्मिक समारंभातही वापरले जाते. हळदीमध्येही अनेक औषधी गुणधर्म आहेत. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट तसेच कर्क्यूमिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते जर तुमच्यात हे 5 गुण असतील तर, शत्रू पण तुमची स्तुती करेल

Zodiac signs : ‘या’ 4 राशीच्या लोकांच्या सहवासात राहा आणि आपले भविष्य उज्ज्वल करा!

Chanakya Niti : वैवाहिक जीवनात चुकूनही ‘या’ 4 गोष्टींना कधीही स्थान देऊ नका, नाहीतर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही!