सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर लगेच ही एक गोष्ट करा; सकारात्मक बदल दिसू लागतील

हिंदू धर्मात सूर्याला जल अर्पण करणे महत्त्वाचे मानले जाते. पण अनेकांना सूर्याला अर्घ्य देण्याचे योग्य नियम माहित नसतात त्यामुळे काही वेळेला हवे तसे फायदे मिळत नाही. त्यामुळे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर अशी एक छोटी गोष्ट आहे जी केल्याने सूर्य देवताचे आशीर्वाद तर मिळतातच पण आयुष्यात सकारात्मक बदलही घडू लागतात.

सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर लगेच ही एक गोष्ट करा; सकारात्मक बदल दिसू लागतील
Know the benefits of offering Arghya to the Sun, do this one thing after offering water for positive changes
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 11, 2025 | 1:50 PM

हिंदू धर्मात सूर्याला जल अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे. सूर्याला जल अर्पण करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. सूर्य देव केवळ प्रकाशाचे स्रोत नाही तर आत्मविश्वास, ऊर्जा आणि चांगले आरोग्य देखील प्रदान करतात. बरेच लोक नियमितपणे सूर्य देवाला जल अर्पण करतात. परंतु अनेकांना पाणी अर्पण केल्यानंतर योग्य प्रक्रिया किंवा ते कसे करावे याबद्दल माहिती नसते. त्यामुळे त्याचे फायदे हवे तसे मिळत नाही. शास्त्रांमध्ये सूर्य देवाला जल अर्पण करण्याचे योग्य नियम सांगितले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने दररोज जल अर्पण केल्यानंतर फक्त एक छोटीशी कृती केली तर सूर्य देवाचे आशीर्वाद तर लाभतातच पण आयुष्यात सकारात्मक बदलही होऊ लागतात. ती कोणती गोष्ट आहे जाणून घेऊयात.

सूर्याला जल अर्पण करण्याचे नियम

शास्त्रांनुसार, सूर्य देवतांची प्रार्थना केल्यानंतर लगेच मागे वळणे किंवा घरी परतणे योग्य नाही. काही क्षण सूर्याकडे तोंड करून उभे राहा, नमस्कार करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. असे केल्याने दिवसभर यश, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल.

सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यानंतर काय करावे?

जेव्हा उगवत्या सूर्याला पाणी अर्पण केले जाते तेव्हा ते पृथ्वीवर पडते आणि सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्यावर प्रत्येक गोष्ट उर्जेत रूपांतरित होते. शास्त्रांनुसार, अर्घ्य अर्पण केल्यानंतर पाणी वाया घालवू नये. प्रथम, आपल्या हातांनी पाण्याला हलकासा स्पर्श करा आणि त्यानंतर ते पाणी थोडेसे तुमच्या कपाळावर, छातीवर किंवा हातांवर लावा. असे केल्याने सूर्याची ऊर्जा तुमच्या शरीरालाही मिळते असे म्हटले जाते.

 यामुळे हळूहळू मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा सुधारते.

सूर्यदेव शक्ती, ऊर्जा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही अर्घ्य अर्पण करता तेव्हा तुम्ही त्या उर्जेशी थेट जोडले जाता. जर तुम्ही अर्घ्य अर्पण केल्यानंतर लगेच तिथून निघून गेलात तर त्या क्षणाची ऊर्जा अपूर्ण राहते. जेव्हा तुम्ही हे पवित्र पाणी तुमच्या शरीराला लावता तेव्हा ती सूर्याची ऊर्जा आशीर्वादाच्या स्वरुपात घेण्यासारखं असते. असे केल्याने तुमच्या शरीराचे तेज वाढते, तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. ज्यांना कमी आत्मविश्वास किंवा नैराश्याचा त्रास आहे. त्यांनी ही पद्धत नियमितपणे करावी. यामुळे हळूहळू मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा सुधारते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)