AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्याला अर्घ्य देतांना करा या मंत्रांचा जाप, मान-सन्मानात होईल वाढ

असे मानले जाते की पत्रिकेत सूर्याची स्थिती चांगली असेल तर व्यक्तीला जीवनात खूप यश आणि प्रसिद्धी मिळते. दुसरीकडे सूर्याची स्थिती योग्य नसल्यास जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

सूर्याला अर्घ्य देतांना करा या मंत्रांचा जाप, मान-सन्मानात होईल वाढ
सूर्याला अर्घ्य देण्याचे फायदेImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 11, 2023 | 12:17 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात सूर्य ग्रहाची (Sun in kundali) देवता म्हणून पूजा केली जाते. सूर्य ही एकमेव देवता आहे जी नियमितपणे भक्तांना प्रत्यक्ष रूपाने दर्शन देते. माणसाच्या आयुष्यात सूर्य ग्रहाचे मोठे योगदान असते. असे मानले जाते की पत्रिकेत सूर्याची स्थिती चांगली असेल तर व्यक्तीला जीवनात खूप यश आणि प्रसिद्धी मिळते. दुसरीकडे सूर्याची स्थिती योग्य नसल्यास जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे, असे धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे. सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि आदर वाढतो. पण सूर्याला जल देण्याचे काही नियम आहेत. या नियमांचे पालन केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची विशेष कृपा मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचे योग्य नियम.

अशा प्रकारे करा जल अर्पण

  1. सकाळी सूर्योदयाच्या वेळीच सूर्याला जल अर्पण करावे. उगवत्या सूर्याला जल अर्पण केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. एक गोष्ट लक्षात ठेवा की सूर्यदेवाला जल देण्यासाठी नेहमी तांब्याचे भांडे वापरावे.
  2. सूर्याला जल अर्पण करताना आपले तोंड पूर्वेकडे असावे. पाण्यात रोळी किंवा लाल चंदन जरूर टाका. याशिवाय सूर्यदेवाला लाल फुले अर्पण करणे देखील शुभ मानले जाते.

सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने होतो हा लाभ

रोज सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने शरीरात ऊर्जा वाढते. त्याचबरोबर सूर्याला रोज अर्घ्य दिल्याने आत्मशुद्धी होते आणि शक्ती मिळते. त्याचबरोबर सूर्याच्या कृपेमुळे समाजात मान-सन्मान वाढतो.

रविवारी करा भगवान सूर्याच्या मंत्रांचा जप

रविवारी जल अर्पण करताना सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करणे शुभ मानले जाते. सूर्याच्या या मंत्रांचा जप केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. येथे सूर्य देवाचे काही चमत्कारिक मंत्र आहेत.

ओम घरिणी सूर्य: आदित्य:

  • ओम हरी हरी सूर्य सहस्रकिरणनारायण मनोवचित फलं देही देही स्वाहा
  • ॐ ऐहि सुर्य सहस्त्रांशो तेजो राशे जगतपते, अनुकम्पयेमां भक्त्या, ग्रहाण्घय दिवाकर:
  • ओम हरी घृणी: सूर्य आदित्य: स्वच्छ ओम
  • ओम ह्रीं सूर्याय नमः
  • ओम सूर्याय नम:
  • ओम घृणी सूर्याय नम:
  • ॐ भास्कराय नमः
  • ओम अर्काय नमः
  • ओम सावित्रे नमः

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.