Maharshi Valmiki Jayanti 2021 | महर्षी वाल्मिकी जयंती, जाणून घ्या माहीत नसलेल्या गोष्टी

आधुनिक इतिहासकारांच्यामते, वाल्मीकीच्या जन्माची नेमकी वेळ निश्चित करणे हा खूप चर्चेचा विषय आहे. परंतू जयंती हिंदू चंद्र पंचागाच्यामते आश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. आज आपण त्यांच्या बद्दल कधीही समोर न आलेल्या गोष्टीची माहिती घेणार आहोत.

Maharshi Valmiki Jayanti 2021 | महर्षी वाल्मिकी जयंती, जाणून घ्या माहीत नसलेल्या गोष्टी
maharshri
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 19, 2021 | 7:08 PM

मुंबई : आधुनिक इतिहासकारांच्यामते, वाल्मीकीच्या जन्माची नेमकी वेळ निश्चित करणे हा खूप चर्चेचा विषय आहे. परंतू जयंती हिंदू चंद्र पंचागाच्यामते आश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. आज आपण त्यांच्या बद्दल कधीही समोर न आलेल्या गोष्टीची माहिती घेणार आहोत.

महर्षि वाल्मिकी ऋषी यांना संस्कृत भाषेचे पहिले कवी मानले जाते. त्यांचे खरे नाव अग्नी शर्मा होते. वाल्मिकीचा शाब्दिक अर्थ असा आहे की जो मुंगी-टेकड्यांपासून जन्माला आलेला असा होतो. ते जेव्हा तपस्या करण्यासाठी बसले होते तेव्हा त्या दरम्यान त्याच्या आजूबाजूला मुंग्यांनी छोट्या टेकड्यां निर्माण करण्यात आल्या त्यावरुनच त्यांना हे नाव देण्यात आले. आधुनिक इतिहासकारांमध्ये, वाल्मीकीच्या जन्माची नेमकी वेळ निश्चित करणे हा खूप चर्चेचा विषय आहे. त्यांची जयंती हिंदू चंद्र कॅलेंडरच्या आश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. तो बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 रोजी साजरा केला जाईल.

महर्षि वाल्मिकी जयंती 2021: तारीख आणि वेळ
पौर्णिमा तिथीला सुरुवात – 19 ऑक्टोबर 19:03
पौर्णिमा तिथी
संपते – 20 ऑक्टोबर 20:26 सूर्योदय- 06:11
सूर्यास्त- 17:46

महर्षि वाल्मिकी जयंती 2021: महत्त्व

महर्षि वाल्मिकी यांचा जन्म भृगु गोत्राच्या ब्राह्मण कुटुंबात झाला. पुराणामध्ये त्यांचे नाव अग्नी शर्मा होते असे पुरावे मिळतात. एका पौराणिक कथेनुसार, नारदमुना पासून प्रभावित होऊन त्यांने “मारा” शब्दाने तपश्चर्या केली, अनेक वर्षांच्या तपश्चर्या दरम्यान, मारा हा शब्द “राम” झाला, राम म्हणजेच भगवान विष्णूचे नाव. त्यानंतर नारदाकडून शास्त्र शिकले आणि एक तपस्वी झाले.

तर स्कंद पुराणातील नगर खंडानुसार, वाल्मिकीचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला आणि त्याचे नाव लोहजंगा असे ठेवले गेले. बारा वर्षे पाऊस न पडल्याने, अन्न मिळवण्यासाठी लोहाजंघाने भुकेल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी जंगलात लोकांना लुटण्यास सुरुवात केली. अशातच त्यांनी जंगलातील सप्तऋषीना लूटण्याची सुरुवात केली.

त्यांपैकी एका सप्तऋषीनी त्यांना ध्यान करण्यास प्रवृत्त केले आणि त्याला एक मंत्र देखील दिला. त्यांनी अनेक वर्षे भक्तीभावाने नामजप सुरू केला.

महर्षि वाल्मिकी संबधी काही तथ्य

भगवान ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने महर्षी वाल्मिकींनी 24000 श्लोक आणि महा काव्य रामायण रचली. पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान रामाने माता सीतेला जंगलात पाठवले, तेव्हा ती महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात राहिली. तिने वाल्मिकी आश्रमात लव आणि कुश या जुळ्या मुलांना जन्म दिला. विष्णुधर्मोत्तर पुराणानुसार महर्षि वाल्मिकी यांचा जन्म त्रेता युगात भगवान ब्रह्मा म्हणून झाला आणि नंतर तुलसीदास म्हणून पुनर्जन्म झाला. अशी मान्याता आहे. वाल्मिकीयांना घेऊन पुराणामध्ये अनेक कथा प्रचलित आहेत.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत )

इतर बातम्या :

कार्तिक महिना 2021: कार्तिक महिना कधी सुरु होतो? या काळात तुळशीची पूजा, तिचे महत्व, जाणून घ्या सविस्तर माहिती

एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो… अहो वाचून तर बघा

Kojagiri purnima 2021 | कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध पिण्याचं शास्त्रीय कारण माहितीय?

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us