
घराचे मुख्य प्रवेशद्वार हे केवळ प्रवेश करण्याचे ठिकाण नाही तर ते सकारात्मक ऊर्जा प्रवेश करणारी जागा देखील आहे. वास्तुशास्त्रात, मुख्य दरवाजाला “गृहमुख” म्हटले जाते आणि तो उर्जेचे केंद्र मानले जाते. म्हणून काही सोप्या उपायांचा अवलंब केल्यास जीवनातील अडचणींवर सहज मात करता येते. तर आजच्या लेखात मुख्य प्रवेशद्वारे कोणत्या गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊयात.
मुख्य दरवाजावर या गोष्टी ठेवा
मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला लाल सिंदूर असलेले स्वस्तिक चिन्ह काढा. तसेच त्याच्या अगदी वर ‘ओम’ चिन्ह काढा किंवा तांब्याचा स्वस्तिक लावा. स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की मुख्य दरवाजावर हे चिन्ह काढल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांती राखण्यास मदत होते.
शनिवारी किंवा मंगळवारी तुमच्या घराच्या मुख्य दारावर लिंबू-मिरचीचे तोरण लावा. त्यावर काळे कापड बांधा. ही विधी करताना ते घराच्या आतील बाजूस तोंड नसावे याची खात्री करा. असे मानले जाते की यामुळे वाईट नजरेचा परिणाम कमी होईल.
वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीच्या दोन लहान मूर्ती ठेवा. एक आतल्या दिशेने आणि दुसरी बाहेरच्या दिशेने असावी. असे केल्याने गणपतीचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील आणि तुम्हाला सर्व अडथळ्यांपासून मुक्तता मिळेल.
शुभ प्रसंगी किंवा सामान्य दिवशीही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरणलावा. असे केल्याने तुमच्या घरात शुभता येते आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो.
घराचा मुख्य दरवाजा उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून नसावा. जर असेल तर वास्तुदोष कमी करण्यासाठी प्रवेशद्वारावर सूर्ययंत्र किंवा सूर्यदेवाची मूर्ती ठेवा. असे केल्याने वास्तुदोष दूर होतात आणि आदर आणि आत्मविश्वास वाढतो.
मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असावा.
मुख्य दरवाजावर पुरेसा प्रकाश आला पाहिजे.
गेटसमोर कोणताही खांब, झाड किंवा कचराकुंडी नसावी.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)