Surya Grahan 2022 : 30 एप्रिलला सुर्यग्रहण, गर्भवती महिलांनी काय करू नये? वाचा सविस्तर

| Updated on: Apr 28, 2022 | 8:08 AM

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणकाळात आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. अशा स्थितीत काही कामं टाळावीत. शनी अमावस्येच्या रात्री 12.15 मिनीटांपासून सूर्यग्रहण होत आहे, जे 01 मे रोजी पहाटे 04:07 वाजता समाप्त होईल.

Surya Grahan 2022 : 30 एप्रिलला सुर्यग्रहण, गर्भवती महिलांनी काय करू नये? वाचा सविस्तर
सूर्यग्रहण काळात काय करु नये?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : 2022 मधील पहिले सूर्यग्रहण (Surya Grahan 2022) 30 एप्रिल रोजी होणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही केवळ खगोलीय (Astronomical) घटना आहे, परंतु धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहण होणे शुभ मानले जात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणकाळात आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. अशा स्थितीत काही कामं टाळावीत. शनी अमावस्येच्या रात्री 12.15 मिनीटांपासून सूर्यग्रहण होत आहे, जे 01 मे रोजी पहाटे 04:07 वाजता समाप्त होईल. मात्र, भारतात हे आंशिक सूर्यग्रहण असेल. त्यामुळे सुतक कालावधी वैध नाही, परंतु या काळात प्रत्येकाने काही खबरदारी घ्यावी. अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याच वेळी, गरोदर महिलांनी या काळात काही विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. शास्त्रानुसार सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी (Pregnant Women) कोणते कार्य टाळावे. याबाबतही काही माहिती दिली जाते.

सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात

धार्मिक शास्त्रानुसार सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी जेवण करू नये. ग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे अन्न दूषित होते, असे म्हटले जाते, म्हणून आधीच शिजवलेल्या अन्नावर तुळशीची पाने किंवा गंगाजल घाला.मान्यतेनुसार, सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी सुई, चाकू, कात्री या धारदार वस्तूंपासून दूर राहावे. असे म्हटले जाते की त्यांचा वापर न जन्मलेल्या मुलावर दुष्परिणाम होऊ शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा सूर्यग्रहण सुरू होते, तेव्हापासून ते ग्रहण संपेपर्यंत गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये, कारण त्याचा न जन्मलेल्या बाळावर नकारात्मक परिणाम होतो.

सुर्यग्रहण पाहू नये

तसेच गरोदर महिलांनी सूर्यग्रहण पाहू नये असेही सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्या आणि पोटातील बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर गरोदर महिलांनी सूर्यग्रहणाच्या वेळी हनुमान चालीसा किंवा दुर्गा चालिसाचे पठण करावे, असेही काहीजण सांगतात. देवी दुर्गा आणि हनुमानजींच्या कृपेने सर्व संकटे आणि नकारात्मक शक्ती दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. गरोदर महिलांनी सूर्यग्रहणाच्या वेळी त्यांच्या प्रमुख देवतेचे स्मरण करावे. याशिवाय सूर्यग्रहण संपल्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.

टीप – ही बातमी लोकमान्यतेवर आधारित आहे. या बातमीतील माहितीची अचूकता, पूर्णता आणि तथ्य यासाठी Tv9 मराठी जबाबदार नाही.