स्वयंपाकघरात ठेवलेल्या या 4 गोष्टी मोठ्या समस्या आणतात आणि घराची समृद्धी हिरावून घेतात.

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील काही वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा आणू शकतात, ज्यामुळे आर्थिक अडचणी आणि तणाव वाढतो. अशा काही चार वस्तू असतात ज्या कधीही स्वयंपाकघरात ठेवू नये. ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. त्या कोणत्या चार वस्तू आहेत जाणून घेऊयात.

स्वयंपाकघरात ठेवलेल्या या 4 गोष्टी मोठ्या समस्या आणतात आणि घराची समृद्धी हिरावून घेतात.
These 4 things kept in the kitchen cause big problems, they should be removed immediately
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2025 | 11:54 PM

वास्तूशास्त्रात स्वयंपाकघराबाबत कितीतरी गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. कारण स्वयंपाकघरात केलेली छोटीशी चूक देखील मोठा वास्तुदोष निर्माण करू शकते. वास्तु तज्ज्ञांच्या मते स्वयंपाकघरातील चार अशा गोष्टी असतात ज्या शक्यतो स्वयंपाक घरात ठेवणे टाळावे. कारण त्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढवतात. ज्यामुळे गरिबी, तणाव आणि अडथळे येतात. म्हणून, त्यांना त्वरित ओळखणे आणि दूर करणे महत्वाचे आहे.

या  चार वस्तू स्वयंपाकघरात ठेवू नयेत.

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर हा घरातील सर्वात महत्वाच्या भागांपैकी एक असते. स्वयंपाकघरातील किरकोळ समस्या देखील मोठ्या प्रमाणात वास्तुदोष निर्माण करू शकते. ज्या घरांमध्ये स्वयंपाकघराशी संबंधित वास्तुदोषांकडे दुर्लक्ष करू नये. दरम्यान त्या कोणत्या 4 गोष्टी आहेत ज्या चुकूनही स्वयंपाक घरात ठेवू नयेत जाणून घेऊयात.

तुटलेली किंवा घाणेरडी भांडी

वास्तुनुसार, स्वयंपाकघरात कधीही तुटलेली किंवा घाणेरडी भांडी ठेवू नयेत. शिवाय, रात्री झोपताना स्वयंपाकघरात कधीही खरकटी म्हणजे जेवल्यानंतरची उष्टी भांडी ठेवू नयेत. त्यामुळे वास्तुदोष होऊ शकतो. म्हणून, ही चूक ताबडतोब दुरुस्त करा. स्वयंपाकघरात नेहमीच स्वच्छता ठेवा. तुटलेली भांडी वापरणे टाळा.

शिळे अन्न

शिळे किंवा कुजलेले अन्न कधीही स्वयंपाकघरात ठेवू नये. सुकलेली फळे, भाज्या आणि मसाले देखील वास्तुदोष निर्माण करतात. यामुळे नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि घराची समृद्धी कमी होते. स्वयंपाकघरात साठवलेल्या कोणत्याही खराब झालेल्या किंवा अनावश्यक वस्तू ताबडतोब फेकून द्या.

काळ्या वस्तू

वास्तुनुसार, स्वयंपाकघरात काळी भांडी, टाइल्स किंवा सजावटीच्या वस्तू वापरू नयेत. काळा रंग नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैवाचे प्रतीक मानला जातो. या भागात काळ्या वस्तूंचा वापर जपून करा. स्वयंपाकघरात नेहमी हलके रंग वापरणे चांगले.

आरसा

स्वयंपाकघरात आरसा ठेवणे अशुभ मानले जाते. आरसे अग्नि तत्वाची ऊर्जा प्रतिबिंबित करतात, ज्यामुळे घरात नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. जर तुमच्या स्वयंपाकघरात आरसा असेल तर तो ताबडतोब काढून टाका. स्वयंपाकघरात आरसा असेल तर तो किमान अशा ठिकाणी असावा ज्यात स्वयंपाक करताना तुमचे प्रतिबिंब दिसणार नाही.

 

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)