AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : तुमच्याही घरात वास्तुदोष आहे, मग हे सोपे उपाय कराच, घरात सदैव बरकत राहील

आपल्या हातून नकळतपणे काही छोट्या-छोट्या चुका होत असतात, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, यामुळे आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. वास्तुदोष दूर कसा करायचा? याबाबत वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

Vastu Tips : तुमच्याही घरात वास्तुदोष आहे, मग हे सोपे उपाय कराच, घरात सदैव बरकत राहील
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 07, 2025 | 8:24 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे, जर तुमच्या घराची दिशा योग्य नसेल किंवा इतर काही गोष्टींमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास अनेक प्रकारच्या अडचणी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. जसं की काही कारण नसताना घरात भांडणं होणं, तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तो घरात टिकून न राहणं, आरोग्याच्या समस्या अशा अनेक प्रकारच्या समस्या अचानक निर्माण होतात, घरातील असे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. याच उपायांबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

वास्तुदोष कसा ओळखायचा?

जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, घरात बरकत नसेल, किंवा काही कारण नसताना अचानक कुटुंबातील कलह वाढला, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला वारंवार आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतील तर अशा घरामध्ये वास्तुदोष असू शकतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत, ज्यामध्ये तुमच्या घराची दिशा, बेडरूम कोणत्या दिशेला आहे? तुमचं स्वयंपाक घर कोणत्या दिशेला आहे? इथपासून ते तुमच्या घरात कोणत्या वस्तू आहेत, इथपर्यंतचे घटक महत्त्वाचे असतात.

वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय

आपलं घर आकर्षक दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं, त्यामुळे आपण विविध सजावटीच्या साहित्याच्या माध्यमातून आपलं घर सजवतो, मात्र घराची सजावट करत असताना तुम्ही जे फुलांचे पॉट, किंवा इतर वस्तूंचा वापर करतात त्या कधीही रिकाम्या ठेवू नका, म्हणजे फुलांच्या पॉटमध्ये नेहमी फूलं असलेच पाहिजे, किंवा त्यात पाणी तरी असावं, ते रिकामे असू नयेत यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याच प्रमाणे तुमच्या घरात कधीही भंगार सामान ठेवू नका असं सामना वेळोवेळी घराच्या बाहेर काढलं पाहिजे, घरामध्ये तुटलेलं -फुटलेलं सामान ठेवू नये, तसेच घरामध्ये बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, घड्याळ देखील ठेवू नये, घड्याळाचा संबंध हा वेळेशी असल्यामुळे घरात नेहमी चालू आणि सुस्थितीमध्ये असलेलं घड्याळच असावं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच घराच्या दक्षिण दिशेला नेहमी एक कमळाचं फूलं असावं, घरात तुम्ही ज्या देवी, देवतांच्या मूर्ती ठेवणार आहात, त्याची दिशा देखील योग्य हवी, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...