AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : तुमच्याही घरात वास्तुदोष आहे, मग हे सोपे उपाय कराच, घरात सदैव बरकत राहील

आपल्या हातून नकळतपणे काही छोट्या-छोट्या चुका होत असतात, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, यामुळे आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. वास्तुदोष दूर कसा करायचा? याबाबत वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

Vastu Tips : तुमच्याही घरात वास्तुदोष आहे, मग हे सोपे उपाय कराच, घरात सदैव बरकत राहील
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 07, 2025 | 8:24 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे, जर तुमच्या घराची दिशा योग्य नसेल किंवा इतर काही गोष्टींमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास अनेक प्रकारच्या अडचणी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. जसं की काही कारण नसताना घरात भांडणं होणं, तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तो घरात टिकून न राहणं, आरोग्याच्या समस्या अशा अनेक प्रकारच्या समस्या अचानक निर्माण होतात, घरातील असे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. याच उपायांबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

वास्तुदोष कसा ओळखायचा?

जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, घरात बरकत नसेल, किंवा काही कारण नसताना अचानक कुटुंबातील कलह वाढला, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला वारंवार आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतील तर अशा घरामध्ये वास्तुदोष असू शकतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत, ज्यामध्ये तुमच्या घराची दिशा, बेडरूम कोणत्या दिशेला आहे? तुमचं स्वयंपाक घर कोणत्या दिशेला आहे? इथपासून ते तुमच्या घरात कोणत्या वस्तू आहेत, इथपर्यंतचे घटक महत्त्वाचे असतात.

वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय

आपलं घर आकर्षक दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं, त्यामुळे आपण विविध सजावटीच्या साहित्याच्या माध्यमातून आपलं घर सजवतो, मात्र घराची सजावट करत असताना तुम्ही जे फुलांचे पॉट, किंवा इतर वस्तूंचा वापर करतात त्या कधीही रिकाम्या ठेवू नका, म्हणजे फुलांच्या पॉटमध्ये नेहमी फूलं असलेच पाहिजे, किंवा त्यात पाणी तरी असावं, ते रिकामे असू नयेत यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याच प्रमाणे तुमच्या घरात कधीही भंगार सामान ठेवू नका असं सामना वेळोवेळी घराच्या बाहेर काढलं पाहिजे, घरामध्ये तुटलेलं -फुटलेलं सामान ठेवू नये, तसेच घरामध्ये बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, घड्याळ देखील ठेवू नये, घड्याळाचा संबंध हा वेळेशी असल्यामुळे घरात नेहमी चालू आणि सुस्थितीमध्ये असलेलं घड्याळच असावं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच घराच्या दक्षिण दिशेला नेहमी एक कमळाचं फूलं असावं, घरात तुम्ही ज्या देवी, देवतांच्या मूर्ती ठेवणार आहात, त्याची दिशा देखील योग्य हवी, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष