Vallabhacharya Jayanti 2021 | श्री वल्लभ आचार्य जयंती, या दिवशी भगवान कृष्णाची पूजा का केली जाते?

| Updated on: May 05, 2021 | 3:26 PM

हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी श्री वल्लभ आचार्य जयंती (Vallabhacharya Jayanti) साजरी केली जाते. हा दिवस श्री वल्लभ आचार्य यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो.

Vallabhacharya Jayanti 2021 | श्री वल्लभ आचार्य जयंती, या दिवशी भगवान कृष्णाची पूजा का केली जाते?
Vallabh Acharya
Follow us on

मुंबई : हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी श्री वल्लभ आचार्य जयंती (Vallabhacharya Jayanti) साजरी केली जाते. हा दिवस श्री वल्लभ आचार्य यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मातील वल्लभ आचार्य जयंती हा एक महत्वाचा दिवस मानला जातो. वल्लभ आचार्यजी पुष्य पंथाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. मान्यता आहे की, वल्लभ आचार्य हे श्रीकृष्णाशी संबंधित आहेत. तर काही लोकांची अशी मान्यता आहे की, श्री वल्लभ आचार्य हे अग्नीदेवतेचा पुनर्जन्म आहे (Vallabhacharya Jayanti 2021 Know The Tithi Importance And Story).

यंदा श्री वल्लभ आचार्य यांची 542 वी जयंती आहे. यावेळी, श्री वल्लभ आचार्य जयंती 7 मे 2021 रोजी येत आहेत. या दिवशी विशेषतः श्री नाथजींची पूजा केली जाते. श्री वल्लभ आचार्य यांच्या भक्तांसाठी हा खूप मोठा दिवस असतो.

एकादशीची तिथी प्रारंभ – 6 मे 2021 रोजी 2 वाजून 10 मिनिटांपासून

एकादशीची तिथी समाप्त – 7 मे 2021 शुक्रवारी दुपारी 3 वाजून 32 मिनिटांपर्यंत

ही जयंती विशेषतः महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि चेन्नईमध्ये साजरी केली जाते. हा दिवस श्री नाथजींच्या मंदिरात आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी अनेक भाविक प्रसादाचे वाटप करतात. या वेळी कोरोनामुळे आपण सर्वांनी आपल्या घरात पूजा करावी.

श्री वल्लभ आचार्य कोण होते?

श्री वल्लभ आचार्य यांच्या वाढदिवशी श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते. कारण वल्लभ आचार्य जी श्रीकृष्णाचे भक्त होते. लोक त्यांना भगवान श्रीनाथांचे स्वरुप मानतात. त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांच्या आईचे नाव इल्लामागारु आणि वडिलांचे नाव लक्ष्मण भट्ट होते.

त्यांच्या जन्माशी संबंधित एक कहाणी आहे, वल्लभाचार्य जी यांचा जन्म अष्टमासमध्ये झाला होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याला मृत म्हणून सोडून टाकले होते. त्यानंतर श्री नाथजी स्वत: आई इल्लामागारूच्या स्वप्नात आले आणि म्हणाले की आपण सोडलेलं बाळ जिवंत आहे. श्रीनाथ यांनी तुमच्या गर्भाशयातून जन्म घेतला आहे. यानंतर जेव्हा त्यांचे आई-वडील तिथे गेले, तेव्हा त्यांनी पाहिले की त्या जागेभोवती आग लागलेली होती आणि तो मध्यभागी अंगठा तोंडात घेऊन होता.

वल्लभाचार्य यांनी अनेक ग्रंथ आणि स्त्रोत्रांची रचना केली होती. त्यांनी आपल्या शेवटच्या काळात आपल्या दोन्ही मुलांना आणि प्रमुख भक्ताला काशीच्या हनुमान खोऱ्यात शिक्षा दिली. त्यानंतर 40 दिवसांनी त्यांनी मौन धारण केलं आणि जलसमाधी घेतली.

Vallabhacharya Jayanti 2021 Know The Tithi Importance And Story

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ramayana | रामायणाच्या त्या एपिसोडमध्ये असं काय दाखवलं, की लॉकडाऊनमध्ये 7.7 कोटी प्रेक्षकांनी तो पाहिला

Kalashtami 2021 | कालाष्टमी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व