
टीम इंडिया आणि बांगलादेशमधील कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सुरू आहे. बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने पहिल्या दिवशी 339-6 धावा केल्या आहेत.

या कसोटी सामन्यामध्ये गेल्या 42 वर्षांमध्ये जे घडलं नाही ते घडलं आहे. बांगलादेश कॅप्टनच्या एका निर्णयाने चेन्नईच्या ग्राऊंडवरील इतिहा बदलला आहे.

चेन्नईमध्ये टॉस जिंकत बांगलादेशचा कॅप्टन नजमुल हुसेन शांतो याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या 21 कसोटींमध्ये हा असा निर्णय कोणत्याही कॅप्टनने आतापर्यंत घेतलेला नाही.

1982 मध्ये चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आतापर्यंत या ग्राऊंडवर 21 कसोटी सामन्यामध्ये हा प्रत्येक कॅप्टनने पहिल्यांजा फलंदाजी निवडली होती.

गेल्या 42 वर्षांपासूनचा हा रेकॉर्ड आता शांतो याने बदलला आहे. घरच्या मैदानावर टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्याची 9वी वेळ होती. याआधी आठवेळा प्रतिस्पर्धी संघांनी टीम इंडियाला पहिल्यांदा बॅटींगसाठी आमंत्रित केलं. यामध्ये ऑस्ट्रेलिया सोडून इतर कोणत्याही टीमला विजय मिळवता आलेला नाही.