IND vs SL : BCCI ची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी या धुरंधर खेळाडूचा संघात समावेश
IND vs SL : भारत विरूद्ध श्रीलंका कसोटी मालिकेसाठी जखमी साई सुदर्शनच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा अपडेटेड संघ जाणून घेऊयात.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. या मालिकेसाठी जखमी साई सुदर्शनच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. BCCI साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानचा संघात समावेश केला आहे. दुखापतीमुळे साई सुदर्शन टीम इंडियातून बाहेर पडला होता. सध्या तो बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दुखापतीतून सावरण्यासाठी उपचार घेत आहे.
BCCI ने आज सोशल मीडिया पोस्टद्वारे साई सुदर्शनच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे. BCCI ने म्हटले की, ‘साई सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. तो बंगळुरू येथील BCCI सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दुखापतीतून सावतर आहे. उजव्या पायाच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीतून तो बरा होत असून त्याची रिकव्हरी चांगली सुरू आहे. BCCI ची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आता निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानचा संघात समावेश केला आहे. 15 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ गालेकडे रवाना होण्यापूर्वी सरफराज कोलंबो येथे संघात सामील होईल.’
प्रदीर्घ काळानंतर टीम इंडियात पुनरागमन
सरफराज खानला बराच काळानंतर टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला होता. सरफराजने आतापर्यंत 6 कसोटी सामन्यांतील 11 डावांमध्ये 37 च्या सरासरीने 371 धावा केल्या आहेत. मात्र, सरफराज खानला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे सध्या कठीण दिसत आहे. देवदत्त पडिक्कल चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने सराव सामन्यात शतक झळकावले आहे. त्यामुळे तो नंबर 3 वर फलंदाजी करताना पहायला मिळू शकतो.
🚨 NEWS 🚨
Sai Sudharsan ruled out of the #SLvIND Test series; Sarfaraz Khan named replacement.
Details 🔽 #TeamIndia https://t.co/lF6h8jabZd pic.twitter.com/Dk0C4HI37p
— BCCI (@BCCI) August 9, 2026
कसोटी सामन्यांचे वेळापत्रक
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना 15 ते 19 ऑगस्टदरम्यान गाले येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 23 ते 27 ऑगस्टदरम्यान कोलंबो येथे खेळला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आवश्यक गुण मिळवणे महत्त्वाचे असल्याने ही मालिका टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, भारतीय संघातील प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडल्याने कर्णधार शुभमन गिलची चिंता वाढली आहे. याआधी जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा हे खेळाडू संघाबाहेर पडलेले आहेत.
भारताचा अपडेटेड संघ
शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर बरार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी आणि सरफराज खान.