IND vs WI 3rd ODI: ‘हे’ तीन खेळाडू बाहेर होऊ शकतात, जाणून घ्या तिसऱ्या वनडेसाठी कशी असेल Playing-11

| Updated on: Jul 26, 2022 | 2:30 PM

भारताने पहिल्या दोन वनडे जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. टीम इंडियाकडे (IND vs WI) आता क्लीन स्वीपची संधी आहे. वनडे सीरीज मधला शेवटचा सामना उद्या बुधवारी होणार आहे.

IND vs WI 3rd ODI: हे तीन खेळाडू बाहेर होऊ शकतात, जाणून घ्या तिसऱ्या वनडेसाठी कशी असेल Playing-11
Follow us on

मुंबई: भारताने पहिल्या दोन वनडे जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. टीम इंडियाकडे (IND vs WI) आता क्लीन स्वीपची संधी आहे. वनडे सीरीज मधला शेवटचा सामना उद्या बुधवारी होणार आहे. तिसऱ्या वनडे आधी राहुल द्रविड प्लेइंग 11 मध्ये बदल करतील का? हा प्रश्न आहे. पहिले दोन सामने बेंचवर बसलेल्या खेळाडूंना राहुल द्रविड (Rahul Dravid) संधी देतील का ? असा प्रश्न आहे. पहिल्या दोन वनडे सामन्यात इशान किशन, (Ishan Kishan) ऋतुराज गायकवाड आणि अर्शदीप सिंहला संधी मिळाली नव्हती. तिसऱ्या वनडेत या तीन खेळाडूंना संधी मिळू शकते. प्रश्न हा आहे की, त्यासाठी कुठल्या खेळाडूंना बाहेर बसवणार?.

यॉर्कर चेंडूंचा अचूकतेने वापर केला

अर्शदीप सिंहला मोहम्मद सिराजच्या जागी संधी मिळू शकते. सिराज पहिले दोन वनडे खेळला असून त्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. पहिल्या वनडेत तो सुद्धा भारताच्या विजयाचा हिरो होता. शेवटच्या षटकात त्याने हुशारीने गोलंदाजी केली होती. यॉर्कर चेंडूंचा अचूकतेने वापर केला होता. ऋतुराज गायकवाडला शुभमन गिलच्या जागी संधी मिळू शकते. इशान किशनला श्रेयस अय्यरच्या जागी संधी मिळू शकते. राहुल द्रविड हे तीन बदल करतात का ? ते सामन्याच्यादिवशीच कळेल. कारण शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर दोघेही चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. श्रेयसने पहिल्या दोन वनडे सामन्यात सलग दोन अर्धशतक झळकावली आहेत. शुभमनने पहिल्या वनडेत अर्धशतक झळकावलं. दुसऱ्या सामन्यात त्याने 43 धावा केल्या होत्या.

टीम इंडियाकडे मोठी संधी

भारताने वेस्ट इंडिजवर विजयी आघाडी घेतली असली, तरी तिसरा वनडे सामना भारतासाठी खास आहे. कारण भारताने आतापर्यंत वेस्ट इंडिजला त्याच्याच घरात क्लीन स्वीप केलेलं नाही. आता टीम इंडियाकडे मोठी संधी आहे.

तिसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग 11

इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन (कॅप्टन), दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, आवेश खान आणि शार्दुल ठाकूर,