IND vs ENG: इंग्लंडला रवाना होण्याआधी KL Rahul ची ‘अग्निपरीक्षा’, फेल झाला तर बाहेर

| Updated on: Jun 15, 2022 | 5:08 PM

IND vs ENG: भारतीय संघासमोर पुढच्या महिन्यात इंग्लंडच आव्हान आहे. भारताला इंग्लंड दौऱ्यात एक कसोटी सामना, तीन वनडे आणि तीन टी 20 सामने खेळायचे आहेत.

IND vs ENG: इंग्लंडला रवाना होण्याआधी KL Rahul ची अग्निपरीक्षा, फेल झाला तर बाहेर
KL Rahul
Image Credit source: BCCI
Follow us on

मुंबई: भारतीय संघासमोर पुढच्या महिन्यात इंग्लंडच आव्हान आहे. भारताला इंग्लंड दौऱ्यात एक कसोटी सामना, तीन वनडे आणि तीन टी 20 सामने खेळायचे आहेत. भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) मागच्यावर्षी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील एक सामना शिल्लक उरला होता. कोरोना व्हायरसमुळे हा कसोटी सामना रद्द झाला होता. ती कसोटी 1 ते 5 जुलै दरम्यान होणार आहे. भारतीय संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यावर (India England Tour) रवाना होणार आहे. मात्र त्याआधी उपकर्णधार के.एल.राहुलला (KL Rahul) अग्निपरीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत नापास झाल्यास, त्याचं इंग्लंडच तिकीट रद्द होऊ शकतं. दुखापतीमुळेच केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली. एजबॅस्टन येथे होणाऱ्या कसोटीत तो खेळणार की नाही? यावर सस्पेन्स कायम आहे.

एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागेल

केएल राहुलची रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टी 20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण मालिका सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला त्याने दुखापतीमुळे माघार घेतली. राहुल बाहेर गेल्यानंतर त्याच्याजागी ऋषभ पंतला कॅप्टन बनवण्यात आलं. क्रिकबजच्या वृत्तानुसार, राहुल कधीपर्यंत मैदानाबाहेर राहील, याबद्दल काही स्पष्टता नाहीय. रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलच इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणं मुश्किल आहे. तो वनडे आणि टी 20 मध्ये खेळण्याबद्दलही साशकंता आहे. इनसाइड स्पोर्ट्ने दिलेल्या वृत्तानुसार, राहुलला शनिवारी एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. त्याला स्वत:चा फिटनेस सिद्ध करावा लागेल.

रिप्लेसमेंटचा विचार होण्याची शक्यता कमी

भारताचा पहिला ग्रुप उद्या 16 जूनला दुसरा ग्रुप 19 जूनला रवाना होणार आहे. निवड समिती केएल राहुलच्या जागी रिप्लेसमेंटचा विचार करण्याची शक्यता कमी आहे. कारण त्यांनी आधीच 17 सदस्यीय संघ जाहीर केलाय. यात तीन सलामीवीर आहेत. रोहित शर्मा, शुभमन गिल हे दोन सलामीवीर आहेत. टीम मॅनेजमेंटने मागणी केली, तर मयंक अग्रवालला संधी मिळू शकते.