एका मॅचमध्ये 8 विकेट घेतल्या, आता टीम इंडियात मिळाली संधी, जाणार ऑस्ट्रेलियाला

| Updated on: Oct 04, 2022 | 6:21 PM

ते चौघं कुठल्या टुर्नामेंटमुळे चर्चेत आले?

एका मॅचमध्ये 8 विकेट घेतल्या, आता टीम इंडियात मिळाली संधी, जाणार ऑस्ट्रेलियाला
Team India
Image Credit source: icc
Follow us on

मुंबई: ऑस्ट्रेलियात T20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यासाठी 6 ऑक्टोबरला टीम रवाना होईल. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याआधी टीम इंडियात काही खेळाडूंची एंट्री झाली आहे. हे कोण खेळाडू आहेत? त्यांना टीम इंडियात का जागा मिळालीय? ते जाणून घ्या.

टी 20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी नेट गोलंदाजांचाही समावेश केलाय. यात कुलदीप सेन, उमरान मलिक, साईन किशोर या तिघांचा समावेश करण्यात आलाय. क्रिकबजने हे वृत्त दिलय.

कुलदीप सेनने अलीकडेच इराणी ट्रॉफी स्पर्धेत शानदार गोलंदाजी केली होती. सौराष्ट्रा विरुद्ध त्याने 8 विकेट घेतल्या होत्या. पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्याडावात पाच विकेट घेतल्या.

तुफानी गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा उमरान मलिक आयपीएलमधून चर्चेत आला होता. ऑस्ट्रेलियात त्याच्या गोलंदाजीमुळे टीम इंडियाच्या बॅट्समनना फलंदाजीचा चांगला सराव होईल.

आर. साई किशोर हा चेन्नईचा डावखुरा गोलंदाज आहे. नेट गोलंदाज म्हणून त्याची निवड करण्यात आलीय. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्सकडून खेळतो. अलीकडेच दुलीप ट्रॉफी स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी केली होती. साऊथ झोनकडून खेळताना त्याने 17 विकेट घेतले होते.