Video: श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्यात सुथार आणि पंतचा बालिशपणा, केएल राहुलने अशी चूक सुधारली
भारत आणि श्रीलंका इलेव्हन यांच्यात तीन दिवसीय कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसावर श्रीलंकेने पकड मिळवली आहे. त्यात भारतीय खेळाडूंचा एक बालिशपणा चर्चेचा विषय ठरला आहे. सुथार आणि पंतच्या कृतीमुळे चाहते आवाक् झाले आहेत.

भारत आणि श्रीलंका इलेव्हन सराव सामन्यात आमनेसामने आले आहेत. कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाची खऱ्या अर्थाने चाचणी परीक्षा आहे. या सामन्यात श्रीलंका इलेव्हनने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात निशान मधुष्का आणि रविंदू रसंथा यांनी श्रीलंकेला चांगली सुरूवात करून दिली. खरं तर पहिल्या विकेटसाठी टीम इंडियाला खूपच घाम गाळवा लागला. एक त विकेट मिळत नव्हती. त्यामुळे गोलंदाज विकेटसाठी धडपड करत होते. त्यामुळे पहिल्या डावात श्रीलंका भारी पडली अशाच भावना क्रीडाप्रेमींच्या मनात होत्या. पहिली विकेट श्रीलंकेच्या 110 धावा असताना मिळाली. ही विकेट पण बालिशपणामुळे गेल्यातच जमा होती. पण केएल राहुलने ऐन वेळी चूक सुधारली आणि भारताच्या खात्यात पहिली विकेट आली. खरं तर मानव सुथार आणि ऋषभ पंतने गल्ली क्रिकेटला लाजवेल असा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यात केला.
ऋषभ पंत-मानव सुथार यांनी काय चूक केली?
कर्णधार केएल राहुलने संघाचं 21वं षटक मानव सुथारच्या हाती सोपवलं. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर निशान मदुष्का स्ट्राईकला होता आणि 66 धावांवर खेळत होता. त्याने या चेंडूवर यशस्वी जयस्वालच्या दिशेने फटका मारला आणि धावत गेला. पण नॉन स्ट्राईकला असलेला रविंदू रसंथा हा चेंडूकडे पाहात होता. त्यामुळे धावलाच नही. यशस्वी जयस्वालने चेंडू मानव सुथारकडे फेकला होता. त्यानंतर त्याने तात्काळ स्ट्राईक विकेट मिळेल या हेतूने चेंडू फेकला. पण हा थ्रो इतका वाईट होता की ऋषभ पंतच्या डोक्यावरून गेला. चेंडू डोक्यावरून गेल्याचं पाहून ऋषभ पंतने ग्लव्ह्ज लावून बेल्स पाडली.
— crictalk (@crictalk7) August 7, 2026
ऋषभ पंतने सोडलेला चेंडू केएल राहुलने पकडला आणि धावत यष्टीकडे गेला. बेल्स पडल्याने त्याने चेंडूसह स्टम्प उचलली. बेल्स पडल्यानंतर स्टम्प उचलणं भाग असता अन्यथा बाद दिलं जात नाही. केएल राहुलच्या समयसूचकतेमुळे भारताला पहिली विकेट मिळाली. पण ऋषभ पंत आणि मानव सुथारच्या कृतीमुळे संताप व्यक्त होते. दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी सुमार गोलंदाजी केली. त्यामुळे विकेटसाठी खूपच धडपड करावी लागत आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात 240 पार धावा केल्या असून यात आणखी भर पडत आहे. प्रसिद्ध कृष्णा, रवींद्र जडेजा, गुरनूर ब्रार यांनी गोलंदाजीत निराशा केली. कुलदीप यादवही खाही खास करू शकला नाही.