AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhir Video: गंभीरची टीम इंडियाला थेट वॉर्निंग, अल्टिमेटम देत म्हणाला जिंकलात तर ठीक आहे नाही तर…

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारतीय संघाला आता एक सल्ला दिला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

Gautam Gambhir Video: गंभीरची टीम इंडियाला थेट वॉर्निंग, अल्टिमेटम देत म्हणाला जिंकलात तर ठीक आहे नाही तर...
| Updated on: Aug 06, 2026 | 11:34 AM
Share

भारतीय क्रिकेट संघ 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत आहे. त्याआधी, भारत 7 ऑगस्टपासून एक सराव सामना खेळणार आहे. भारतीय संघ सध्या 5 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये सराव करत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने टीम इंडियाला आगामी मालिकेबद्दल सावध केले आणि श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाला कसे सामोरे जायचे हे समजावून सांगितले. गंभीरने टीम इंडियामध्ये सामील झालेल्या तीन नवीन खेळाडूंचे स्वागतही केले. वेगवान गोलंदाज आकिब नबी आणि फिरकी गोलंदाज सारांश जैन पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात सामील होत आहेत. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे नबीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला, तर वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीमुळे सारांशला संधी मिळाली. आता मालिकेपूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघाला एक वॉर्निंग दिली आहे.

सुभदीप घोष श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियासोबत क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून आपल्या कामाला सुरुवात करत आहेत. त्यांनी टी. दिलीप यांची जागा घेतली, ज्यांचा कार्यकाळ इंग्लंड दौऱ्यासोबत संपला होता. टीम इंडियाच्या सरावापूर्वी गंभीरने नबी, सारांश आणि सुभदीप यांचे स्वागत केले. मुख्य प्रशिक्षकांनी सारांशला सांगितले की, “टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी गेल्या रणजी ट्रॉफी हंगामातील जम्मू आणि काश्मीरच्या विजयाबद्दल नबीचे अभिनंदन केले.  त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे.”

बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये, गंभीर म्हणाला की, “पुढे काय आहे आणि ते का खेळत आहेत हे त्यांना माहीत आहे. त्यांनी आपले सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजेत आणि सर्व अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. जेव्हा 15 ऑगस्टची सकाळ येईल, मग ते प्रथम फलंदाजी असो किंवा प्रथम गोलंदाजी, त्यांनी प्रत्येक उत्तरासाठी तयार असले पाहिजे. कोणताही प्रश्न विचारला गेला तरी, त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असले पाहिजे. म्हणून, आतापासून आपण कोणतीही कसर सोडता कामा नये.”

भारताने 2008 पासून श्रीलंकेविरुद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या संधीसाठी आगामी दोन कसोटी सामन्यांची मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय संघाने सध्याच्या चक्रात तीन मालिका खेळल्या असून, त्यात एक जिंकली, एक गमावली आणि एक अनिर्णित राहिली आहे. अजून तीन मालिका बाकी आहेत. श्रीलंकेनंतर, भारत न्यूझीलंडचा दौरा करेल, जिथे ते दोन कसोटी सामने खेळतील. त्यानंतर, 2027 च्या सुरुवातीला मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळले जातील.

Follow Us
बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप
Sheikh Hasina | बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप, डिसेंबरमध्ये पुनरागमनाची घोषणा!
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला,
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला, बैठकीत... महाराष्ट्राच्या राजकारणातील हालचाली वाढल्या
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय
संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर...
Sanjay Raut On Shivsena Hearing | आम्ही निश्चिंत आहोत...संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर संजय राऊतांचा इशारा!
...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील म
Sanjay Raut | ...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील महत्त्वाची बाब
देशाच्या संविधानावर विश्वास...राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
Sanjay Raut | देशाच्या संविधानावर विश्वास..., खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय... संजय राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...