Rishabh Pant: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे संघातून डावललं, पण बीसीसीआयनं ऋषभ पंतला मोठी जबाबदारी
Rishabh Pant News: भारत आणि वेस्ट इंडिजसाठी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे, या संघात पंतला स्थान देण्यात आले नसले तरीही बीसीसीआयनं मोठी जबाबदारी दिली आहे.

वेस्ट इंडिजचा संघ वनडे आणि टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. वेस्ट इंडिज या दौऱ्यात 3 वनडे सामने आणि 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
वेस्ट इंडिज विरोधातील वनडे मालिकेत भारताचा आक्रमक फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत याला संधी मिळालेली नाही, पण बीसीसीआयने यावेळी मात्र त्याला मोठी संधी दिली आहे.
बीसीसीआयने वेस्ट इंडिज विरोधातील वनडे आणि टी 20 मालिकेसाठी भारताचे संघ जाहीर केले. वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचे कर्णधारपद शुभमन गिलकडे असणार आहे. टी-20 मालिकेसाठी भारताचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे असेल.
बीसीसीआयनं इराणी कप स्पर्धेसाठी शेष भारत संघाचे कर्णधारपद ऋषभ पंतकडे सोपवले आहे. इराणी कप स्पर्धेत शेष भारत आणि रणजी ट्रॉफी विजेते जम्मू काश्मीर यांच्यात सामना रंगणार आहे.
शेष भारत आणि जम्मू काश्मीर यांच्यातील सामना 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरल दरम्यान श्रीनगरमध्ये पार पडणार आहे.